0
0
0
0
0

महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 144

पाकिस्तान बिथरलं! एअर स्ट्राईकनंतर सीमेवर मध्यरात्री अंदाधुंद गोळीबार; भारताने दिलं चोख प्रत्युत्तर

भारताने नुकत्याच केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. देशाच्या संरक्षणासाठी भारतीय लष्कराने उचललेले हे पाऊल निर्णायक ठरले असून, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारताने नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. या कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून सीमारेषेवर सतत आगळिक केली जात आहे. बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील करनाह सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने...

प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी ‘बदाम’ ठरत आहेत गेमचेंजर – अभिनेत्री सोहा अली खान पुण्यात आयोजित चर्चासत्रात व्यक्त केला अनुभव!

पुणे :- सोहा अली खान म्हणाल्या,जेव्हा मी घरी जेवण बनविण्याची तयारी करते, तेव्हा प्रोटीनला सर्वात वरचे स्थान असते. विशेषतः माझी मुलगी वाढत्या वयाची आणि खूप ऍक्टिव्ह असल्याने. बदाम हे आमच्यासाठी पोषणाचा सोपा आणि विश्‍वासार्ह स्रोत ठरले आहेत. शूट्सदरम्यान देखील मला बदाम खायला आवडतात. ते मला पचायला जड न वाटता एनर्जी देतात. मी माझ्या मुलीच्या आहारात, तिच्या नाश्त्यात किंवा सॅलडमध्ये...

“गुगल मॅपवर BEST बस मार्गाची माहिती आता तुमच्या बोटांच्या टप्प्यात!” – मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते नव्या युगाची सुरुवात

मुंबई | मंत्रालय :- मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि सुविधाजनक अशी योजना आज प्रत्यक्षात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘गुगल मॅपवर बस मार्ग माहिती प्रणाली’चे भव्य उद्‍घाटन मंत्रालयात पार पडले. यामुळे आता BEST बसेसच्या मार्गांची, थांब्यांची आणि वेळापत्रकाची माहिती नागरिकांना थेट गुगल मॅपवर सहज मिळणार आहे. स्मार्ट सिटी आणि डिजिटलीकरणाकडे एक ठोस पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुंबईसारख्या महानगरात नागरिकांचा...

“नेत्रदान हे श्रेष्ठ दान” – अशोक जोशी यांनी मरणोत्तर नेत्रदान करून समाजासाठी दिला प्रेरणादायी संदेश!

खोपोली | ७ मे २०२५ :- “मरावे परी नेत्र रुपी उरावे” या विचाराला वास्तवात उतरवत खोपोलीतील अशोक जगन्नाथ जोशी (वय ८५) यांनी मरणोत्तर नेत्रदान करून समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. समाजसेवेची जाणिव आणि सामाजिक बांधिलकी जपणारे अशोक जोशी यांचे ६ मे रोजी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. नेत्रदानाची इच्छा – कुटुंबीयांचा उदात्त निर्णय स्वतःच्या मृत्यूनंतर देखील कुणाच्या तरी जीवनात...

मिठी नदी स्वच्छता घोटाळा उघड – ६५ कोटींचा अपहार उघडकीस; BMC अधिकारी आणि कंत्राटदारांविरोधात FIR, आर्थिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

मुंबई : मिठी नदी स्वच्छता प्रकल्पात मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असून, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) या प्रकरणात पहिला FIR दाखल केला आहे. याअंतर्गत मंगळवारी शहरातील ८ ते ९ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यात आले. या छाप्यांमध्ये ब्रुहनमुंबई महानगरपालिका (BMC) अधिकाऱ्यांच्या आणि संबंधित कंत्राटदारांच्या घरांवर व कार्यालयांवर झडती घेण्यात आली.  तपासाची पार्श्वभूमी:महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे विधान...

नवी मुंबईत पाच बांगलादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्यासाठी अटकेत; बनावट कागदपत्रांचा वापर उघड

नवी मुंबई पोलीस दलाच्या मानवी तस्करी विरोधी कक्षाने (AHTC) रविवारी सकाळी पनवेलमधील करंजाडे भागात टाकलेल्या छाप्यात पाच बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. हे सर्वजण बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्यास असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या विशेष कारवाईदरम्यान पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले, त्यामध्ये दोन महिला, एक बालक आणि तीन पुरुषांचा समावेश होता. प्राथमिक चौकशीनंतर पाच प्रौढांना अटक करण्यात आली असून, सहा वर्षीय...

येरवड्यात भरधाव दुचाकीने घेतला तरुणाचा बळी; वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष महागात पडले

पुण्यातील येरवडा भागात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लक्ष्मीनगर, येरवडा येथील रहिवासी निखिल खेडकर (वय ३० वर्षे) याचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दि. ०४ मे २०२५ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास डॉन बॉस्को स्कूल समोरील खाऊ गल्ली, दुकान क्रमांक ०१, शास्त्रीनगर चौक येथे घडली. पोलीसांच्या प्राथमिक तपासानुसार, मयत निखिल खेडकर याने स्वतःच्या ताब्यातील दुचाकी अत्यंत भरधाव,...

पुण्यात पाण्याची टंचाई कायम; ‘स्मार्ट’ म्हणवणाऱ्या शहरात टँकरवर अवलंबून नागरिक, पालिकेच्या पायाभूत सुविधांचा बोजवारा

पुणे शहरातील अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिकच गंभीर बनली आहे. पुणे महापालिकेने जरी उत्तम जलपुरवठा पायाभूत सुविधा उभारल्याचा दावा केला असला, तरी वास्तवात नागरिकांना अजूनही टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. महापालिकेच्या (PMC) आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षांत टँकरच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. एप्रिल २०२३ च्या तुलनेत एप्रिल २०२५ मध्ये PMC च्या टँकरने जवळपास १४,००० अधिक फेऱ्या मारल्या. यामध्ये १,०००...

महाराष्ट्रात ‘डिस्टिंक्ट अभिमत विद्यापीठ’ स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल; नवी दिल्लीतील कार्यशाळेत शिक्षण तज्ज्ञांचा मंथन

महाराष्ट्रात 'डिस्टिंक्ट अभिमत विद्यापीठ' (Distinct Deemed University) स्थापन करण्याच्या उद्देशाने आज नवी दिल्ली येथे एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या महत्त्वपूर्ण कार्यशाळेला विविध क्षेत्रातील शिक्षण तज्ज्ञ, धोरणनिधी संस्थांचे प्रतिनिधी, अभ्यासक आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेला मी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिलो आणि 'डिस्टिंक्ट अभिमत विद्यापीठ' या संकल्पनेविषयी सर्वांशी सविस्तर चर्चा केली. शिक्षण क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांचे विचार ऐकून घेतले,...

सिंहगड रोडवर भीषण अपघात! भरधाव ट्रकखाली चिरडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू — ट्रकचालक फरार, पोलीस तपास सुरू

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात वडगाव ब्रिजवर आज सकाळी एक भीषण अपघात घडला असून, एका निष्पाप नागरिकाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मृत इसमाचे नाव किरण पावनोजी गावडे पाटील (वय ३६) असून, ते गगनगिरी मंदिराजवळ, हिंगणे, कर्वेनगर येथे वास्तव्यास होते. घटनेचा तपशील: ▪️ दिनांक २ मे २०२५ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास, वडगाव ब्रिजवर मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर ही दुर्घटना घडली.▪️...

Copyright ©