महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 5

जगदाळे यांचे पार्थिव आज पहाटे पुण्यातील कर्वेनगर येथे दाखल

0

पुणे :- ज्या सहलीसाठी उत्साहाने तयारी केली, ज्याचं स्वप्न अनेक वर्षांनी प्रत्यक्षात उतरवले… तीच सहल त्यांच्या कुटुंबासाठी आजीवन दु:ख घेऊन आली. पुण्यातील कोंढवा-सासवड रोडवरील फर्साण व्यावसायिक कौस्तुभ गणबोटे आणि त्यांचे जिवलग मित्र, इंटेरियर डिझायनर संतोष जगदाळे यांचा काश्मीरमधील पहलगामजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी (२२ एप्रिल) बायसरण, पहलगाम येथील या भीषण हल्ल्यात किमान २६ पर्यटकांचा बळी गेला, ज्यात...

सिद्धिविनायक मंदिरात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नारळ, फुलं, मिठाई यांच्यावर बंदी; भाविकांनी सहकार्याची केली विनंती

मुंबई | प्रतिनिधी – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशभरात धार्मिक स्थळांना संभाव्य धोका असल्याचा गुप्तचर अहवाल प्राप्त झाल्यानंतर, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षा कारणास्तव मंदिरात नारळ, फुले, हार, प्रसाद (मिठाई) व इतर अर्पणांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी रविवार, ११ मे २०२५ पासून लागू करण्यात आली आहे. डुरवा आणि जाईची फुले...

जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत! आमदार हेमंत रासने यांची न थकणारी सेवा नागरिकांच्या हितासाठी

पुणे, कसबा पेठ – लोकप्रतिनिधी हा जनतेचा खरा सेवक असतो, हे विधान कसबा पेठचे आमदार हेमंत भाऊ रासने यांच्या कार्यातून पुन्हा सिद्ध झाले आहे. नुकतेच अधिवेशन संपल्यानंतर कोणतीही विश्रांती न घेता त्यांनी थेट जनतेच्या सेवेत स्वतःला झोकून दिले आहे. या सततच्या कार्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, अशाच जबाबदार लोकप्रतिनिधींची गरज असल्याची भावना पुणेकर व्यक्त करत आहेत. अधिवेशन संपले, पण विश्रांती...

गिरगावमध्ये गुढीपाडवा शोभायात्रेत मराठी अस्मितेचा नारा! ‘आमच्या महाराष्ट्रात ताटात काय खायचे ते आम्हीच ठरवणार’ फलकावरून अमराठींना इशारा?

मुंबई आणि उपनगरांमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वादाची ठिणगी पुन्हा एकदा पेटली आहे. गुढीपाडवा शोभायात्रांमध्ये याचे पडसाद उमटले असून, गिरगावमध्ये एका वादग्रस्त फलकावरून हा विषय अधिक चर्चेत आला आहे. गिरगावमध्ये 'आमच्या महाराष्ट्रात मराठी माणसांनी ताटात काय खायचे हे फक्त आम्हीच ठरवणार' असा मजकूर असलेला फलक झळकल्याने वाद निर्माण झाला आहे. 'आम्ही गिरगावकर' संस्थेने हा फलक लावत आपली ठाम भूमिका स्पष्ट केली...

विधीसंघर्षित बालकाकडून गावठी कट्टा जप्त; भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई!

पुणे – शहरात अवैध शस्त्रवहनाला आळा घालण्यासाठी कार्यरत असलेल्या भारती विद्यापीठ पोलिसांनी नुकतीच एक मोठी कारवाई केली असून एका अवघ्या १७ वर्षाच्या विधीसंघर्षित बालकाकडून गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत राऊंड जप्त करण्यात आले आहे. ही घटना २९ एप्रिल २०२५ रोजी घडली असून या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली...

चहाच्या टपरीवरचा दीपस्तंभ! जामखेडच्या बंडू ढवळे यांची कहाणी ठरतेय कष्ट, जिद्द आणि यशाची प्रेरणादायी शिदोरी

जामखेड (अहमदनगर): आयुष्याच्या रणांगणात जिद्द, कष्ट आणि अपार प्रेमाने आपल्या लेकराच्या स्वप्नांना साकार करणारं एक नाव म्हणजे श्री. बंडू ढवळे. काल जामखेड दौऱ्यावर असताना एका साध्या चहाच्या टपरीवर घेतलेला चहा फक्त चविष्ट नव्हता, तर तो आनंदाचा आणि समाधानाचा घोट होता. कारण त्या चहामागची गोष्ट ही मुळातच अशा एका वडिलांची होती, ज्यांनी स्वतःच्या श्रमाने आपल्या मुलाचं आयुष्य उजळवलं. बापाचं स्वप्न, लेकाचं...

सुधा मूर्ती यांनी सांगितला सरलाचा प्रेरणादायी प्रवास – वैयक्तिक दुःखावर मात करत स्वावलंबनाची वाटचाल!

नवी दिल्ली – सुप्रसिद्ध समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती यांनी GDP MyGov ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सरलाचा प्रेरणादायी प्रवास उलगडला. सरलाने आपल्या जीवनात मोठे वैयक्तिक दुःख सहन केले, मात्र सरकारी योजनांच्या मदतीने ती नव्या उमेदीने उभी राहिली. तिची ही संघर्षगाथा इतर महिलांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. वैयक्तिक दुःखावर मात करून स्वावलंबनाचा प्रवास सरला ही एक सर्वसामान्य स्त्री. मात्र नियतीच्या आघातांनी तिचे आयुष्य...

देशभक्तीचा महायोद्धा हरपला – ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शोकसंदेश – 'भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अनमोल हिरा निखळला' मुंबई, 4 एप्रिल – भारतीय चित्रपटसृष्टीला राष्ट्रभक्तीची ओळख देणारे, "भारतकुमार" म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक मनोजकुमार यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्याने हिंदी सिनेसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात सांगितले, "चित्रपटसृष्टीतून देशभक्ती आणि भारतीय संस्कृती जनमानसावर ठसवणाऱ्या...

पुण्यात बुधवार पेठ रेड लाईट एरियामध्ये धाड: ८ बांगलादेशी महिलांना अटक, अवैधरित्या देशात प्रवेश करुन वेश्या व्यवसाय करत असल्याचे उघड

पुणे शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियामध्ये मोठी पोलिस कारवाई करण्यात आली असून, या कारवाईत अवैधरित्या भारतात वास्तव्यास असलेल्या ८ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे या महिला बॉर्डर पार करून भारतात आलेल्या असून, त्यानंतर पुण्यात वेश्या व्यवसाय करीत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. ही कारवाई पुणे शहराचे मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर करण्यात...

मुंबई, ठाणे, रायगड, पुण्यात जोरदार पाऊस; पालघरसाठी रेड अलर्ट! | हवामान विभागाचा इशारा गंभीर

मुंबई | २६ जुलै २०२५:- मुंबईसह उपनगरात शनिवारी सकाळपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट आणि पालघरसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे प्रशासन आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हवामान खात्याने सांगितले की, शनिवारी दिवसभरात आणि रविवारी सकाळपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग ४०-५० किमी/तासापर्यंत जाऊ शकतो. पावसाचा डेटा - मुंबईसह...

Copyright ©