महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 34

पावसाळी अधिवेशन २०२५ – आठवडा २, दिवस २ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान भवनात सकाळी आगमन!

0

मुंबई – महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी १०.४५ वाजता विधान भवनात दाखल झाले. मुंबईतील विधान भवन परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त आणि राजकीय हालचालींना वेग आला आहे. आजच्या दिवशी महत्त्वाचे विधेयक मांडले जाण्याची शक्यता असून, अनेक विरोधी पक्षनेत्यांनी शेतकरी कर्जमाफी, महागाई, पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, महिला सुरक्षेचा मुद्दा आणि बेरोजगारी यावर चर्चा करण्याची...

टाकवे बु., फळणे, बेलज परिसरात आमदार सुनील शेळके यांचा “जनसंवाद” दौरा; ग्रामस्थांच्या समस्या ऐकून तोडगा काढण्याचे आश्वासन

0

टाकवे | मावळ तालुक्यातील जनतेच्या दारात जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार सुनील आण्णा शेळके यांनी हाती घेतलेल्या “जनसंवाद” अभियानाचा पुढील टप्पा टाकवे बु. ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत टाकवे बु., फळणे, बेलज, राजपुरी व भोयरे पाथरगाव या गावांमध्ये पार पडला. ग्रामस्थांच्या समस्या थेट आमदारांसमोरया अभियानादरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित विविध अडचणी मांडल्या. पाणीपुरवठ्यातील अनियमितता, मुख्य व अंतर्गत रस्त्यांची...

पुण्यात भरदिवसा खून! आरोपीस घटनास्थळावरून पळताना अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची तत्पर कारवाई

0

पुणे | पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना ११ जुलै २०२५ रोजी समोर आली. वैष्णवी बिल्डिंगजवळील एचडीएफसी एटीएम समोर, सार्वजनिक ठिकाणी भरदिवसा झालेल्या या खुनानं परिसरात खळबळ माजवली आहे. फक्त काही तासांत आरोपीस ओळखून त्याला अटक करून पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या वेगवान व कुशल तपास कौशल्याचं दर्शन घडवलं. घटनेचा तपशील दिनांक ११ जुलै २०२५, सायंकाळच्या...

चारोली परिसरात बिबट्याचा वावर! नागरिकांनी घ्यावी काळजी, वनविभाग सज्ज

0

चारोली बुद्रुक परिसरातील दाभाडे वस्तीमध्ये बिबट्या मादी आणि तिची दोन बछडी आढळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत वनविभागाने तात्काळ कारवाई सुरू केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. वनविभागाचे अधिकारी श्री. ई. आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच आमचे सहकारी श्री. अनिकेत गायकवाड यांच्या सहकार्याने ट्रॅप कॅमेरे व यंत्रणा...

मुंबईत डिजिटल क्रांतीचा नवा अध्याय! MMRDA आणि NPCI यांच्यात ऐतिहासिक करार, BKC येथे NPCI चे जागतिक मुख्यालय उभारणार

0

मुंबई :- महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही आर्थिक व्यवहारांचे प्रमुख केंद्र आहे. या अर्थसत्ता आणि तंत्रज्ञानाच्या केंद्रबिंदूत आता आणखी एक मोठी भर पडली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून, या करारानुसार BKC (बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स) येथे NPCI चे जागतिक मुख्यालय उभारले जाणार आहे. मुख्यमंत्री...

मावळ तालुक्यात पर्यावरणपूरक ऐतिहासिक निर्णय – विदेशी वृक्ष काढून स्थानिक प्रजातींची लागवड; जैवविविधतेला मिळणार नवा श्वास

0

पर्यावरण संतुलन राखण्यासाठी मावळ तालुक्यात एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. सह्याद्री देवराई संस्था आणि पुणे उपवनसंरक्षक कार्यालय (पुणे विभाग) यांच्यातील करारावर आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. या करारानंतर सोमाटणे, गहुंजे आणि भंडारा डोंगर परिसरात विदेशी वृक्षांची जागा भारतीय स्थानिक प्रजाती घेणार आहेत. गेल्या काही दशकांत सबबाबूल, ग्लिरिसीडिया यांसारख्या विदेशी जातींचा परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रसार...

लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो! पर्यटकांची मोठी गर्दी; प्रशासन सतर्क

0

लोणावळा, १६ जून २०२५: पावसाच्या संततधारामुळे लोणावळ्याच्या प्रसिद्ध भुशी धरणात जलस्तर झपाट्याने वाढत असून, आज सकाळपासून धरणातून पाणी वाहू लागले आहे. पर्यटकांमध्ये या घटनेमुळे उत्साहाचे वातावरण आहे. विशेषतः शनिवारी आणि रविवारी होणारी गर्दी लक्षात घेता, प्रशासनाने सुरक्षा उपाययोजना अधिक कडक केल्या आहेत.  संततधार पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ मुळशी, पवना, आंधा आणि इतर घाटमाथ्यांमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर असल्याने भुशी...

किराणा दुकान चालकाला पोलिसांकडून थप्पड; अधिकाराचा गैरवापर की मनमानी? परिसरात संतापाची लाट

0

पुणे : किराणा दुकान चालवणाऱ्या एका सामान्य नागरिकाला एका पोलिस कर्मचाऱ्याने भरदिवसा थप्पड मारल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांकडून सामान्य जनतेवर होणारा अशा प्रकारचा वर्तणूक म्हणजे स्पष्टपणे अधिकाराचा गैरवापर असल्याची तीव्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे. पोलिसांनी कायदा रक्षक न बनता कायदा भंग करणारे होऊ नये – नागरिकांची...

हडपसर पोलिसांचे यशस्वी ऑपरेशन; चांदीचे २ लाखांचे दागिने जप्त, ४ गुन्ह्यांची उकल

0

पुणे शहरातील हडपसर परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली होती, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हडपसर पोलीस स्टेशनच्या सतर्क तपास पथकाने केवळ ३ विधिसंघर्षित बालकांना अटक करून थेट ४ घरफोडी प्रकरणांचा छडा लावला आहे. दि. २ जून २०२५ रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना हडपसर पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड आणि त्यांचा तपास पथक...

‘ऊर्जासंपन्न महाराष्ट्र’चा आणखी एक टप्पा पूर्ण! तिल्लारी जलविद्युत प्रकल्पासाठी 1008 कोटींचा सामंजस्य करार – 240 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारणार

0

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि हरित भविष्यासाठी घेतल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण पावलांपैकी एक म्हणजे तिल्लारी उदंचन जलविद्युत प्रकल्प. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभाग आणि श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था, वारणानगर यांच्यात आज 240 मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या सामंजस्य करारामुळे केवळ ऊर्जा उत्पादनास गती मिळणार नाही, तर 1008...

Copyright ©