महाराष्ट्र
दिल्ली विजय आणि पानिपत बदला विजयसोहळा उत्साहात संपन्न
पुणे : भारत इतिहास संशोधक मंडळ व श्री देवदेवेश्वर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दिल्ली विजय आणि पानिपत बदला विजयसोहळा’ मंगळवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात व गौरवशाली वातावरणात संपन्न झाला. मराठ्यांच्या शौर्य, पराक्रम आणि ऐतिहासिक विजयाची स्मृती जागवणारा हा सोहळा इतिहासप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण केले तसेच माधवराव पेशवे, महादजी शिंदे व तुकोजी होळकर...
पंकजा ताईंच्या उपस्थितीत महाराष्ट्र–जपान मैत्रीला नवे बळ; सागा प्रांताच्या गव्हर्नर यामागुची यांच्यासोबत पर्यावरण व विकासावर ऐतिहासिक चर्चा
रामटेक : महाराष्ट्र–जपान संबंधांना नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण बैठक आज रामटेक निवासस्थानी पार पडली. जपानमधील सागा प्रांताचे गव्हर्नर यामागुची योशिनोरी आणि त्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने पंकजा ताईंची सदिच्छा भेट घेत राज्यातील पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकमुक्ती, नदी पुनरुज्जीवन, शिक्षण आणि विविध औद्योगिक क्षेत्रांतील सहकार्याबाबत सखोल चर्चा केली. या भेटीत पंकजा ताईंनी महाराष्ट्र शासनाच्या ‘स्वच्छ जलस्रोत’ आणि ‘नदी पुनरुज्जीवन’ या धोरणात्मक उपक्रमांवर भर देत...
मुंबईत देशातील पहिला ‘संगीत रस्ता’ लोकार्पित; किनारी मार्गावरून वाहनचालकांना ‘जय हो’ची सुरेल अनुभूती
मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावर उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्यावहिल्या ‘संगीत रस्त्या’चे आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या अभिनव उपक्रमामुळे मुंबईकरांसह पर्यटकांना आता प्रवास करताना एक अनोखा आणि सुरेल अनुभव मिळणार आहे. या कार्यक्रमाला हंगेरीचे वाणिज्य दूत श्री. फॅरेन जारी, माजी खासदार राहुल शेवाळे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व...
“घड्याळाचा गजर, विकासावर नजर!” – प्रभाग २५ (क) मधून राधिका कुलकर्णींचा निर्धार
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (क) – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई परिसरात विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याचा संकल्प घेऊन ॲड. राधिका उल्हास कुलकर्णी मैदानात उतरल्या आहेत.“सर्वांच्या विकासासाठी एक मत – राधिका साठी!” हा केवळ नारा नसून, सर्वसामान्यांच्या मनातील अपेक्षांचा आवाज बनत आहे. विश्वासाचं नातं जपणारा उमेदवार म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या राधिका कुलकर्णी यांनी प्रभागातील...
‘वर्षा’ निवासस्थानी शिवजन्मोत्सव विशेषांकाचे प्रकाशन; शिवकालीन वैभवाचा जागतिक गौरव
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मुंबई येथील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ‘पुण्यनगरी’ लातूर आवृत्तीच्या ‘शिवजन्मोत्सव’ विशेषांकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न झाले. मा. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या कार्यक्रमामुळे वातावरण शिवमय झाले होते. यावर्षीचा विशेषांक शिवकालीन पराक्रम आणि दुर्गवैभवावर आधारित असून, बारा ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या इतिहासाचा सखोल आढावा यात मांडण्यात आला...
सोनं पॉलिशच्या बहाण्याने लुट करणारी परराज्यातील टोळी जेरबंद; पर्वती पोलिसांची शिताफीने कारवाई, २.५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे शहरात नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांवर पर्वती पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई करत सोनं–चांदी पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने लूट करणारी परराज्यातील टोळी पकडली आहे. या कारवाईत २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे लगड व पॉलिशचे साहित्य असा सुमारे २ लाख ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी दांडेकर...
जालना जिल्हा वार्षिक योजनेसाठी वाढीव निधीची मागणी; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आढावा बैठक
जालना : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी जालना जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२६–२७ या वर्षाचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्याच्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून जालना जिल्ह्यासाठी वाढीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. बैठकीदरम्यान पायाभूत सुविधा,...
जनतेचा आशीर्वादच खरी ताकद; घराघरात पोहोचताना मिळतोय भरभरून प्रतिसाद – सुनील अण्णा शेळके
पिंपरी-चिंचवड : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील प्रत्येक सोसायटी, प्रत्येक गल्लीत आणि घराघरात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधताना मिळणारा विश्वास आणि आशीर्वाद हीच आमची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन सुनील अण्णा शेळके यांनी केले. प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आणि उत्साह पाहता विकासाच्या मुद्द्यांवर मतदार ठामपणे उभे राहत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. सुनील अण्णा शेळके म्हणाले की, आजचे मतदार सुज्ञ...
निवडणुकीनंतर प्रभाग ४ मधील अतिक्रमणांवर कारवाईची मागणी; सहाय्यक आयुक्तांची प्रत्यक्ष भेट
शहरातील प्रभाग ४ मध्ये काही दिवसांपासून प्रलंबित असलेली विकासकामे पूर्णत्वाच्या मार्गावर असतानाच निवडणुकीमुळे ती तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. मात्र निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर आता ही कामे पुन्हा गतीने सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः वाढत्या अतिक्रमणांच्या पार्श्वभूमीवर तातडीने कारवाई व्हावी, यासाठी सामाजिक कार्यकर्त्या प्रभा करपे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. आज सहाय्यक आयुक्त Somnath Bankar यांची भेट घेऊन...
काटेवाडीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे मतदान; लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांना मतदानाचे आवाहन
बारामती (काटेवाडी) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. साध्या व संयत पद्धतीने मतदान केंद्रावर दाखल होत त्यांनी सर्वसामान्य मतदारांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदान केले. त्यांच्या उपस्थितीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी...








