महाराष्ट्र
“खड्ड्यांत रुतलेली बस, १० तासांचे प्रयत्न, आणि अखेर शेतकऱ्यांची बससेवा बंद!”
खेड तालुका (जि. रत्नागिरी) – जिथं नागरिक मागणं करतात तिथं दुर्लक्ष, आणि जिथं कोणी विचारतही नाही तिथं कोट्यवधींचे प्रकल्प – हा राज्य शासनाचा नवा विकासनामा असं चित्र सध्या खेड तालुक्यात पाहायला मिळत आहे. खेड तालुक्यातील तीन गावांमध्ये बससेवा बंद झाली आहे. कारण? रस्त्यावर पडलेले इतके खोल खड्डे, की बस अडकली आणि बाहेर काढायला दोन ट्रॅक्टरने तब्बल १० तासांचा वेळ लागला! शक्तीपीठ...
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; रुग्णालय प्रशासनही दोषी ठरले, विश्वस्तांवर फौजदारी खटला
पुणे, दि. ३ : पैशाअभावी उपचार नाकारल्यामुळे गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात अखेर मोठी आणि निर्णायक कारवाई करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे केवळ डॉक्टरच नव्हे, तर रुग्णालय प्रशासनही दोषी असल्याचे स्पष्ट झाले असून, रुग्णालयाच्या ११ विश्वस्तांवर फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. गर्भवती तनिषा भिसे यांना उपचार नाकारल्यानंतर त्यांनी जुळ्या मुलींना...
महागाई आटोक्यात, GDP ‘फुल स्पीड’मध्ये; रेपो रेट कपातीची अपेक्षा वाढली, तरी RBI कडून ‘सरप्राईज’ निर्णयाची शक्यता वाढली
देशाची अर्थव्यवस्था सध्या सकारात्मक संकेत देत असताना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आगामी द्विमासिक पतधोरण (MPC) बैठक सर्वांच्या नजरा खिळवून ठेवत आहे. 3 ते 5 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या या महत्त्वपूर्ण बैठकीचे निर्णय 5 डिसेंबर, शुक्रवारी जाहीर केले जाणार आहेत. महागाई नियंत्रणात आल्याचे स्पष्ट दिसत असून, GDPने दुसऱ्या तिमाहीत घेतलेला वेग अक्षरशः रॉकेटसारखा असल्याने अर्थव्यवस्थेत नवचैतन्य निर्माण झाले आहे. यासोबतच, GST दर कपात...
विमाननगरमध्ये पुन्हा पाणीटंचाईचा विळखा – उन्हाळ्यापूर्वीच टँकरवर अवलंबित्व वाढले
पुणे: उन्हाळ्याला अजून दीड महिना शिल्लक असतानाच विमाननगर परिसरात पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या पुन्हा उफाळून आली आहे. काही आठवडे दिलासा मिळाल्यानंतर आता पाण्याचा दाब कमी झाल्याने नागरिकांना पुन्हा खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आणि चिंता निर्माण झाली आहे. विमाननगरमधील लंकड कॉलोनाड 1 या गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष संबित प्रधान यांनी सांगितले की, मागील दीड महिना परिसरात पाण्याची...
राज्यातील १७ हजार गावांना सामुदायिक वन हक्क देण्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भर; आदिवासी विकासासाठी त्वरित कार्यवाहीचे निर्देश
मुंबई : राज्यातील १७ हजार गावांना सामुदायिक वन हक्क मिळण्यास पात्र असून, आतापर्यंत ५ हजार गावांना सामुदायिक वन हक्क प्रदान करण्यात आले आहेत. उर्वरित गावांना लवकरात लवकर वन हक्क मिळवून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग व संबंधित यंत्रणांनी प्राधान्याने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षात वन हक्क कायदा २००६ च्या...
दावोस 2026 मध्ये महाराष्ट्राचा जागतिक ठसा – ‘स्केल’नंतर आता ‘ट्रस्ट’चा काळ, गव्हर्नन्समध्ये नवे युग सुरू
दावोस 2026 मध्ये महाराष्ट्राने जागतिक स्तरावर प्रशासनाच्या भविष्यासाठी नवी दिशा मांडली आहे. “From Scale to Trust: A Global Consensus on GovTech” या विषयावर झालेल्या प्रभावी संवादात जर्मनी, ब्राझील, फ्रान्स, बर्मुडा, गॅबॉन, संयुक्त अरब अमिराती आणि आफ्रिकन युनियनमधील वरिष्ठ नेत्यांनी सहभाग घेतला. या चर्चेत डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (DPI) च्या पुढील टप्प्यावर भर देण्यात आला. या संवादातील मुख्य निष्कर्ष असा होता की,...
उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपचा प्रचार शिगेला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य जाहीर सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित केले. या सभेमुळे उल्हासनगरमध्ये भाजपच्या प्रचाराला नवे बळ मिळाले असून, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे...
सांगलीत संभाजीराव भिडे गुरुजींची भेट; ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास’ व्रताचे पालन करण्याचे आवाहन
सांगली : ‘Shri Shivpratishthan Hindusthan’ चे संस्थापक गुरुवर्य Sambhaji Bhide गुरुजी यांची सांगली येथील प्रवासादरम्यान भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याचा योग आला. या भेटीत धर्म, राष्ट्र आणि समाजजागृतीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. सध्या गुरुजी ‘धर्मवीर Sambhaji Maharaj बलिदान मास’ व्रताचे पालन करत असून, हिंदू समाजात जागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. या व्रतामध्ये धर्मरक्षण, संस्कृती जतन, स्वसंरक्षणाची जाणीव आणि सामाजिक...
सामाजिक सौहार्दाचे दर्शन – विविध शुभविवाह व साखरपुडा समारंभांना मान्यवरांची उपस्थिती
सामाजिक बांधिलकी आणि आपुलकीचे नाते अधिक दृढ करणाऱ्या विविध मंगलप्रसंगी उपस्थित राहण्याचा योग लाभला. श्री. अशोक राजेघोरपडे यांच्या कन्येच्या शुभविवाह सोहळ्यानिमित्त देविका द प्राईड डेस्टिनेशन, वाढे फाटा येथे उपस्थित राहून नवदांपत्याला आशीर्वाद दिले. त्याचप्रमाणे श्री. शेषन माळी यांच्या कन्येच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी विठ्ठल मंगल हॉल येथे उपस्थित राहून भावी दाम्पत्याला शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच डॉ. सुधाकर लावंड यांच्या पुत्राच्या शुभविवाह सोहळ्यानिमित्त...
संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत संगमनेर सेवा समितीचा ऐतिहासिक विजय; सौ. मैथिलीताई सत्यजित तांबे नगरअध्यक्षपदी दणदणीत निवड
संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांनी प्रचंड बहुमतासह ऐतिहासिक विजय मिळवत राजकीय वर्तुळात आपली ताकद सिद्ध केली आहे. या निवडणुकीत नगरअध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. मैथिलीताई सत्यजित तांबे यांनी सर्वाधिक मतांनी विजय संपादन करत जनतेचा विश्वास पुन्हा एकदा जिंकला आहे. त्यांच्या या दणदणीत विजयामुळे संगमनेर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेरच्या जनतेने माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या...








