महाराष्ट्र
शिवम एंटरप्रायजेसकडून नामांकित कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार भरती; 8वी पासपासून पदवीधरांपर्यंत सुवर्णसंधी!
पुणे | प्रतिनिधी – कामाच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी! शिवम एंटरप्रायजेस घेऊन येत आहे नामांकित कंपनीमध्ये थेट कामगार भरतीची सुवर्णसंधी. शिक्षण ८वी पासपासून ते पदवीधरांपर्यंत असलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी पात्र असून, आकर्षक पगार, ओव्हरटाईमची सुविधा, पी.एफ. व ईएसआयचा समावेश यामुळे ही नोकरी अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरणार आहे. भरतीसंदर्भातील महत्त्वाची माहिती: शैक्षणिक पात्रता:8 वी, 9 वी, 10 वी,...
चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगलेला व पॅरोलवरून फरार सराईत चोर बाणेर पोलिसांच्या जाळ्यात, मुंबईतून अटक
बाणेर पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या चोरीच्या प्रकरणात शिक्षा भोगलेला आणि दुसऱ्या चोरीच्या गुन्ह्यात पॅरोलवरून फरार असलेल्या सराईत आरोपीला बाणेर पोलिसांनी अटक करून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली असून, सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांची कडक भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी बाणेर पोलीस स्टेशन येथे फिर्यादीने तक्रार दाखल केली होती....
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागतिक स्तरावर प्रसार – राजदूत विशाल शर्मा
मुंबई, दि.20 : पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोमध्ये स्थापित करण्यात आल्याने या घटनेला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जगभरातील नागरिकांना डॉ. आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची तसेच शिक्षण, मानवाधिकार आणि सामाजिक समतेच्या मूल्यांची ओळख करून देणे, हाच या उपक्रमाचा मुख्य...
भीषण अपघातात कबाजी कोळपेचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
पाटस : मोरगाव-सुपा-चौफुला या अष्टविनायक महामार्गावर पळवी गावाजवळ शनिवारी सकाळी भीषण अपघात घडला. खडीने भरलेला डंपर (हायवा) वेगाने जात असताना त्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. धडकेच्या तीव्रतेमुळे दुचाकी रस्त्यावर फेकली गेली आणि दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली. या अपघातात कबाजी भिमाजी कोळपे (वय 65, रा. वाई, जि. सातारा) यांचा मृत्यू झाला असून...
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : राज्यात मागील काही दिवसात झालेल्या पूर परिस्थितीमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता नव्याने अभियानाला सुरुवात करण्यात आली असून या अभियानाच्या अंमलबजावणीतून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधान भवन येथील मंत्रिपरिषद सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शीर्षक गीत लोकार्पण कार्यक्रम पार पडला. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात...
शाखा १११ मध्ये शिवशक्तीचा ऐतिहासिक विजय; दीपक सावंत यांना १२,२०६ मतांची घवघवीत आघाडी
मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार दीपक राजाराम सावंत यांनी शाखा क्रमांक १११ मधून दणदणीत विजय मिळवला आहे. तब्बल १२,२०६ मतांच्या भरघोस फरकाने त्यांनी विजय संपादन करत परिसरात शिवशक्तीचा झेंडा फडकावला आहे. या विजयामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे. ढोल-ताशांच्या गजरात,...
पिंपळे सौदागरमधील दवाखाना आणि तालिम अत्याधुनिक स्वरूपात उभारावी – नाना काटे यांची आयुक्तांकडे ठाम मागणी
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपळे सौदागर भागात नागरिकांच्या सेवेसाठी सुरू असलेला महापालिकेचा दवाखाना आणि व्यायामासाठी असलेली तालिम सध्या जीर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे या दोन्ही सुविधा नव्याने, अत्याधुनिक स्वरूपात उभारण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे. त्यांनी यासाठी थेट महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना सविस्तर निवेदन दिले. दवाखाना अपुरा आणि जीर्ण नाना...
अभिषेक–रिंकूचा धडाका, न्यूझीलंडसमोर भारताचे 239 धावांचे आव्हान
भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाने दमदार फलंदाजी करत विक्रमी धावसंख्या उभारली आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून तब्बल 238 धावा केल्या असून न्यूझीलंडसमोर 239 धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात युवा फलंदाज अभिषेक शर्मा याने आपल्या तुफानी खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या 35 चेंडूत 84 धावा करताना त्याने 5...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा निर्णय: वैष्णवी आत्महत्या प्रकरणाचा फटका – राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी
पुणे | प्रतिनिधी – राज्यात खळबळ उडवणाऱ्या वैष्णवी शशांक हगवणे आत्महत्या प्रकरणाचा मोठा राजकीय परिणाम झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) आता कठोर पाऊल उचलले आहे. या प्रकरणाशी संबंधित पक्षाचे स्थानिक नेते राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, याबाबतचे अधिकृत पत्रकही जाहीर करण्यात आले आहे. आत्महत्येनंतर राजकीय भूकंप २४ मे रोजी,...
बृहन्मुंबई महानगरपालिकेत HPV लसीकरण जनजागृती कार्यक्रम; महिलांच्या आरोग्य संरक्षणावर भर
मुंबई : Brihanmumbai Municipal Corporation येथे मानव पॅपिलोमाव्हायरस (HPV) लसीकरणाविषयी आयोजित जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिलांच्या आणि बालिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी HPV लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. गर्भाशय मुखाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून बचावासाठी ही लस अत्यंत प्रभावी असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. “उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक प्रभावी” हा संदेश देत...











