पुण्यातील गुन्हेगारी जगताला हादरवणाऱ्या एका गंभीर प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगार श्वेतांग भास्कर निकाळजे याच्याकडून दोन अग्नीशस्त्र आणि एक चारचाकी वाहन असा तब्बल ६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे परिसरात दहशत पसरवणाऱ्या टोळीचे कृत्य उघडकीस आले असून पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अपहरणासारखी घटना — फिर्यादीवर जीवघेणा दबाव
८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास फिर्यादी त्याच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये असताना आरोपी श्वेतांग निकाळजे आणि त्याचे साथीदारांनी त्याला बळजबरीने एका कारमध्ये बसवले.
फिर्यादीने लग्न करू नये आणि एयरटेल कंपनीच्या टॉवरच्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे द्यावेत, या उद्देशाने आरोपींनी त्याच्यावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार केला असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
भोर रोडवर नेऊन आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यावर दोन पिस्तुलं लावून “तुला कोणत्या पिस्तुलातून गोळी घालू?” अशी थरकाप उडवणारी धमकी दिली.
दुसरीकडे, त्यांचे साथीदार म्हणाले — “तु भाऊचे ऐकत नाहीस, तुझ्या डोक्यात कोयता टाकतो!” या शब्दांनी फिर्यादी दहशतीने थरथर कापू लागला.
फिर्यादी पळून गेल्याचा राग — मित्रालाही लक्ष्य
फिर्यादी त्यांच्या तावडीतून सुटल्याचा राग मनात धरून आरोपी आणि त्याच्या टोळीने फिर्यादीच्या मित्राला शिवाजीनगर येथे नेऊन मारहाण केली. त्यालाही पिस्तुल लावून धमकावण्यात आले, ज्यामुळे या टोळीची क्रूरता स्पष्ट होते.
गुन्हा नोंद — गंभीर कलमांखाली तपास जलद गतीने
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 507/2025 नोंदवण्यात आला असून
भारतीय न्यायसंहितेचे कलम 140(2), 127(2), 351(3), 352, 3(5),
भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25
आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3), 135
अन्वये गुन्हा दाखल आहे.
अटक आणि जप्ती — पोलिसांची धडाकेबाज कृती
पोलिस अंमलदारांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे
-
श्वेतांग निकाळजे (वय 37)
-
ओम संजय गायकवाड (वय 26)
यांना 20 नोव्हेंबर 2025 रोजी अटक करण्यात आली.






