नवी दिल्ली – बहुचर्चित सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत न्यायालयाने पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय नक्कीच न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक बळकट करणारा आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर झाला असून, त्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई आवश्यक आहे. हा निकाल दिल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हाच निर्णय स्वागतार्ह असून, मी मनापासून याचे स्वागत करतो. आजचा निर्णय केवळ एका व्यक्तीसाठी नाही, तर सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायक ठरेल. पोलिस दलाने जर कायद्याचे उल्लंघन केल्यास, त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते, हा आजचा संदेश ठळक आहे.
या प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडवली होती. अनेक सामाजिक कार्यकर्ते, मानवी हक्क संघटना यांनीही या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून आवाज उठवला होता. “हा न्याय आहे अन्यायाचा पराभव!” – नागरिकांच्या प्रतिक्रिया
महत्त्वाचे मुद्दे:
उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने केला कायम