गडचिरोलीची लेक जागतिक व्यासपीठावर झळकली! आशियाई ‘पॅरा अर्चरी’ स्पर्धेत क्षेता कोवेचा सुवर्ण-कांस्य पदकांचा पराक्रम
गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरणारी ऐतिहासिक कामगिरी करत आधी येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी क्षेता कोवे हिने दुबई येथे पार पडलेल्या आशियाई पॅरा गेम्समधील ‘पॅरा अर्चरी’ स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्य पदकांची कमाई केली आहे. या उल्लेखनीय यशामुळे जागतिक स्तरावर गडचिरोली जिल्ह्याचे नाव उज्वल झाले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून क्षेता कोवेचे मनःपूर्वक अभिनंदन करताना म्हटले की, “गडचिरोलीची लेक जागतिक व्यासपीठावर...
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन; मंत्रीमंडळातील मान्यवरांनी जनजागृतीचे केले आवाहन
आझाद मैदान, मुंबई मुंबईत आज नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित भव्य आणि जनजागृतीपर प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात राज्यातील मान्यवर मंत्री, कायदेतज्ज्ञ, पोलीस अधिकारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नवीन कायद्यांबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी उभारण्यात आलेले हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली. या विशेष प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मंत्रीमहाशयांनी नवीन कायद्यांची गरज, त्यामागील...
ज्ञानोबा-तुकाराम जयघोषात दुमदुमला टाळगाव-चिखली परिसर महापालिकेच्या शाळेत रंगला भक्ती, एकात्मता आणि परंपरेचा अद्भुत संगम
पिंपरी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५० वी) जयंती वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळेत भक्तिमय वातावरणात भव्य पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने टाळगाव-चिखली परिसरातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळा व महाविद्यालय परिसरातून ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत टाळ-मृदुंगाच्या गजरासह टाळ-चिपळ्यांचा नाद आणि विद्यार्थ्यांच्या अभंगांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. ‘ज्ञानोबा माऊली’ आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत सहभाग घेतला होता. महिला बचत गटांच्या सदस्यांनी, स्थानिक समाजसेवकांनी, वारकरी बांधवांनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली. वारकरी परंपरेतील पालखी सोहळा जसा श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे, तसाच तो एकात्मता आणि सामाजिक बंध दृढ करणारा सोहळा ठरला. पालखी सोहळ्याचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, समाज विकास विभाग उपायुक्त ममता शिंदे, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण कुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपिठाचे संचालक ह. भ. प. राजू महाराज ढोरे ,डॉ. स्वाती मुळे आणि शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यांच्या नियोजनामुळे आणि समन्वयामुळे संपूर्ण मिरवणूक सोहळा शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कोका-कोला बेव्हरेजेससोबत सामंजस्य करार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासन आणि हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड (HCCB) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारांचा उद्देश स्थानिक पातळीवर उद्योग व प्रशासन यांच्यातील सामंजस्य अधिक दृढ करणे, रोजगार संधी वाढवणे आणि सामाजिक तसेच पर्यावरणीय उपक्रमांना चालना देणे असा आहे. या सामंजस्य करारांतर्गत पुढील जिल्ह्यांचा समावेश आहे: पुणे जिल्हा प्रशासन + HCCB पालघर जिल्हा...
संभाजीनगरात दुहेरी शोकांतिका! सासूच्या निधनानंतर काही मिनिटांत सूनेचाही मृत्यू — वेदांतनगर हादरले
छत्रपती संभाजीनगर शहरात मंगळवारी दुपारी घडलेली एक दुर्दैवी घटना सर्वांना हळहळवून गेली आहे. वेदांतनगर परिसरात सासूच्या निधनाची बातमी कळताच सुनेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. काही मिनिटांतच दोन पिढ्या हरवल्याने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. मृतांमध्ये रुक्मिणी रूपचंद परदेशी (वय 96) आणि त्यांची सून विजया परदेशी (वय 62) यांचा समावेश आहे. दोघीही विद्यापीठाचे माजी सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी यांच्या आई आणि...
भाजपा शहर निवडणुकीची कमान आता आमदार अमित गोरखे यांच्या हाती..!
पिंपरी चिंचवड जिल्हा निवडणूक संचालन समितीच्या संयोजक पदी आमदार अमित गोरखे तर सहसंयोजक म्हणून मोरेश्वर शेडगे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्शभूमीवर निवडणूक कालखंडात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबविणे तसेच उमेदवारांच्या मुलाखती त्यासाठी उमेदवार चयन करणे व निवडणूक प्रचार यंत्रणा कार्यान्वित करणे यासाठी जिल्हा निवडणूक संचालन समितीची भूमिका अत्यंत महत्वाची असते. राजकीय व संघटनात्मक दृष्ट्या अशा...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागतिक स्तरावर प्रसार – राजदूत विशाल शर्मा
मुंबई, दि.20 : पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोमध्ये स्थापित करण्यात आल्याने या घटनेला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जगभरातील नागरिकांना डॉ. आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची तसेच शिक्षण, मानवाधिकार आणि सामाजिक समतेच्या मूल्यांची ओळख करून देणे, हाच या उपक्रमाचा मुख्य...
बिग बॉस 19 चा विजेता ठरला लोकप्रिय स्पर्धक; सर्वाधिक मतांनी प्रेक्षकांनी दिला जबरदस्त पाठिंबा, घरात आनंदाचा जल्लोष
मुंबई – देशभरातील लाखो प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा परमोच्च बिंदू असलेल्या बिग बॉस 19 च्या ग्रँड फिनालेचा पडदा अखेर उघडला आहे. या सिझनमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवणाऱ्या एका दमदार स्पर्धकाने सर्वाधिक सार्वजनिक मतांच्या जोरावर विजेतेपद पटकावले आहे. मतदानाच्या शेवटच्या तासांपर्यंतही चुरस कायम होती, परंतु अखेरीस चाहत्यांनी केलेल्या प्रचंड मतांच्या पावसामुळे या सदस्याला चमकदार विजय निश्चित झाला. फिनालेच्या रात्रीचे वातावरण पूर्णतः रोमांचक होते. मंचावर...
सोसायटीच्या सुरक्षारक्षकाकडूनच घरफोडी : पर्वती पोलिसांनी उघड केला ८.६५ लाखांच्या ऐवजाचा मोठा गुन्हा
पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरातील औदुंबर सोसायटी, गणेशमळा येथे मोठी घरफोडी उघडकीस आली. दि. ०८ ऑगस्ट २०२५ ते दि. १२ ऑगस्ट २०२५ दरम्यान घरमालक बाहेरगावी असताना चोरट्याने घरात प्रवेश करून सुमारे १० तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ८,६५,००० रुपये किंमतीचा ऐवज चोरला. फिर्यादीच्या तक्रारीनंतर पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २५४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१ (३),...
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : राज्यात मागील काही दिवसात झालेल्या पूर परिस्थितीमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता नव्याने अभियानाला सुरुवात करण्यात आली असून या अभियानाच्या अंमलबजावणीतून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधान भवन येथील मंत्रिपरिषद सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शीर्षक गीत लोकार्पण कार्यक्रम पार पडला. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात...







