पुरस्थितीवर महापालिकेची सतत नजर : नागरिकांसाठी तातडीच्या मदतसेवा सज्ज
पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील अनेक धरणे १०० टक्के भरल्याने आणि सततच्या पावसामुळे नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आपली संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ मदतसेवा सुरू करण्यात आल्या आहेत. महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला असून, नागरिकांना आवाहन केले आहे की आपत्कालीन परिस्थितीत त्वरित 020-67331111 / 020-28331111 या...
मुंबई रेल्वे स्थानकांवर मराठ्यांचे वादळ, प्रत्येक ठिकाणी एकच आवाज – आरक्षण हक्काचा!
मुंबई : राज्यभरातून मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईकडे धाव घेत आहे. रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली असून, डबाबंद गाड्यांमध्येही मराठ्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतोय. प्रत्येक स्थानकावर "आरक्षण आमचा हक्क आहे, तो आम्ही मिळवणारच!" या घोषणांचा गजर दुमदुमत आहे. छोट्या गावांपासून ते शहरांपर्यंत, हजारो कार्यकर्ते कुटुंबांसह रेल्वेतून मोर्चाकडे रवाना होत आहेत. मुंबईतील दादर, सीएसएमटी, ठाणे, वांद्रे, मानखुर्द या प्रमुख स्थानकांवर मराठा...
निवडणूक आचारसंहिता लागू; शहरात महापालिकेची धडक कारवाई, ४,८१९ अनधिकृत राजकीय फ्लेक्स हटवले
पिंपरी-चिंचवड | राज्य निवडणूक आयोगाकडून १५ डिसेंबर २०२५ रोजी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरभरात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली असून, १६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत तब्बल ४,८१९ अनधिकृत व नियमबाह्य राजकीय फ्लेक्स, बॅनर्स आणि जाहिरात साहित्य हटवण्यात आले आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह व...
गोंदिया जिल्ह्यातील अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
गोंदिया जिल्ह्यातील सीएमआर तांदूळ जमा करून ठेवल्याप्रकरणी चौकशी करण्यात येईल. तसेच या प्रकरणातील जिल्हा पुरवठा अधिकारी याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. गोंदिया जिल्ह्यातील सीएमआर तांदुळाच्या साठ्याप्रकरणी सदस्य नाना पटोले यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम यांनी माहिती देताना सांगितले की, सन २०२३–२४ या वर्षासाठी आवश्यक...
संभाजीनगरात दुहेरी शोकांतिका! सासूच्या निधनानंतर काही मिनिटांत सूनेचाही मृत्यू — वेदांतनगर हादरले
छत्रपती संभाजीनगर शहरात मंगळवारी दुपारी घडलेली एक दुर्दैवी घटना सर्वांना हळहळवून गेली आहे. वेदांतनगर परिसरात सासूच्या निधनाची बातमी कळताच सुनेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. काही मिनिटांतच दोन पिढ्या हरवल्याने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. मृतांमध्ये रुक्मिणी रूपचंद परदेशी (वय 96) आणि त्यांची सून विजया परदेशी (वय 62) यांचा समावेश आहे. दोघीही विद्यापीठाचे माजी सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी यांच्या आई आणि...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील मानाच्या गणपतींना भेट – श्रींच्या चरणी प्रार्थना करून घेतले पुणेकरांचे आशीर्वाद
पुणे : पुण्यातील मानाचे गणपती हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहेत. गणेशोत्सवाला राज्य शासनाने ‘राज्य उत्सवाचा’ दर्जा दिल्याने या सणाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील विविध मानाच्या व ऐतिहासिक गणेश मंडळांना भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले आणि राज्यातील जनतेसाठी प्रार्थना केली. मुख्यमंत्री म्हणाले, “श्री गणेश सर्वांना सुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्य देवो. सर्वांच्या मनोकामना पूर्ण...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागतिक स्तरावर प्रसार – राजदूत विशाल शर्मा
मुंबई, दि.20 : पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोमध्ये स्थापित करण्यात आल्याने या घटनेला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जगभरातील नागरिकांना डॉ. आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची तसेच शिक्षण, मानवाधिकार आणि सामाजिक समतेच्या मूल्यांची ओळख करून देणे, हाच या उपक्रमाचा मुख्य...
राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जम्मू कश्मीरकडे रवाना
जम्मू येथील वैष्णो धाम, कालिका धाम येथे होणाऱ्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा १९ वर्षाखालील मुला-मुलींचा संघ रवाना झाला. या संघाला क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले, क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यापूर्वी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने श्री विठ्ठलराय जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे क्रीडा संकुल, डेरवण (ता....
मुंबई सज्ज! मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी महाआंदोलन; पोलिसांना दिलं हमीपत्र, छावणीचे स्वरूप धारण केलेलं आझाद मैदान
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या लढ्याला आता नवी दिशा मिळाली आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २७ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे धडक मोर्चा सुरू केला असून, २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर आरक्षणासाठी भव्य आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. सध्या ते शिवनेरी येथे दाखल झाले असून उद्या सकाळी ते मुंबईत दाखल होणार...
ज्ञानोबा-तुकाराम जयघोषात दुमदुमला टाळगाव-चिखली परिसर महापालिकेच्या शाळेत रंगला भक्ती, एकात्मता आणि परंपरेचा अद्भुत संगम
पिंपरी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५० वी) जयंती वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळेत भक्तिमय वातावरणात भव्य पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने टाळगाव-चिखली परिसरातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळा व महाविद्यालय परिसरातून ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत टाळ-मृदुंगाच्या गजरासह टाळ-चिपळ्यांचा नाद आणि विद्यार्थ्यांच्या अभंगांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. ‘ज्ञानोबा माऊली’ आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत सहभाग घेतला होता. महिला बचत गटांच्या सदस्यांनी, स्थानिक समाजसेवकांनी, वारकरी बांधवांनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली. वारकरी परंपरेतील पालखी सोहळा जसा श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे, तसाच तो एकात्मता आणि सामाजिक बंध दृढ करणारा सोहळा ठरला. पालखी सोहळ्याचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, समाज विकास विभाग उपायुक्त ममता शिंदे, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण कुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपिठाचे संचालक ह. भ. प. राजू महाराज ढोरे ,डॉ. स्वाती मुळे आणि शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यांच्या नियोजनामुळे आणि समन्वयामुळे संपूर्ण मिरवणूक सोहळा शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.







