भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली
भारतीय जनता पक्षाने (भाजप) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीतून प्रमुख उमेदवारांची निवडक नावे समोर आली आहेत, ज्यात नागपूर दक्षिण-पश्चिममधून देवेंद्र फडणवीस आणि कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. याशिवाय, 13 महिला उमेदवारांच्या नावांचीही यादी जाहीर करण्यात आली असून, यात मुंबईतील गोरेगावमधून माजी मंत्री विद्या ठाकूर यांचे नाव सामील आहे. यावेळी दिलेल्या यादीत मुंबईच्या...
सोमाटणे-वारसोळी टोलनाके प्रकरणावर विधानसभा हादरली! सुनिल शेळके यांनी उपस्थित केला मुद्दा; दादा भुसे यांचे चौकशीचे आदेश
मुंबई, १६ जुलै २०२५ – मुंबई विधानसभेत आज मावळच्या जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा झाली. आमदार सुनिल अण्णा शेळके यांनी सोमाटणे आणि वारसोळी टोलनाक्यांतील अनियमितता, वाहतूक कोंडी, नागरिकांच्या मनस्तापाचा मुद्दा आक्रमकपणे मांडत सरकारचे लक्ष वेधले. यावर मंत्री दादा भुसे यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले. मुख्य मुद्दे: ▪️ सोमाटणे व वारसोळी टोलनाक्यांमधील अंतर फक्त ३१ किमी, नियमांनुसार किमान ६० किमी असणे अपेक्षित▪️ आरबीकडून कामात...
कपड्यांचे दुकान फोडणारा अट्टल चोरटा अखेर जेरबंद! पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
पुणे | त्रिमूर्ती चौक: अल्फा मेन्स हब या कपड्यांच्या दुकानात झालेल्या चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. अवघ्या काही दिवसांतच भारती विद्यापीठ पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे, आरोपी हा यापूर्वीही चोरीच्या गुन्ह्यांत सामील असल्याचे उघडकीस आले आहे. २.३२ लाखांच्या कपड्यांची चोरी! दि. २८ मार्च २०२५ रोजी ते दि. २९ मार्च २०२५ या दरम्यान, त्रिमूर्ती चौकातील...
पिंपरी चिंचवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; शस्त्र विरोधी मोहिमेत ५० पिस्तूल व कोयत्यांचा मोठा साठा जप्त, २५ सराईत गुन्हेगारांना अटक
पिंपरी चिंचवड : अवैध शस्त्रबाजी व सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर कठोर कारवाई करत पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठी मोहीम उभी केली आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष शस्त्रविरोधी मोहिमेत अवघ्या २५ दिवसांत तब्बल ५० पिस्तूल आणि ७९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही मोहीम १३ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२५ या कालावधीत हाती घेण्यात आली होती....
सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडून विजयस्तंभाच्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन तयारीची पाहणी
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या स्वातंत्र्य, समता व बंधुतेच्या मूल्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत पार पाडणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी प्रशासन, सामाजिक संघटना व नागरिकांनी परस्पर समन्वय साधून सोहळा हा यशस्वी करावा. प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे अनुयायांनी पालन करून सहकार्य करावे, असे आवाहान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ....
खराडी परिसरात शाळेच्या बसला आग; १५ विद्यार्थ्यांची थोडक्यात सुटका.
पुणे - खराडी येथील तुलजा भवानी नगर परिसरात गुरुवारी दुपारी शाळेच्या बसला भीषण आग लागली. सुदैवाने, १५ विद्यार्थ्यांना वेळेवर बसमधून उतरवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेचा तपशील: ही घटना दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास फिनिक्स वर्ल्ड स्कूलच्या शाळेच्या बसमध्ये घडली. विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी निघालेल्या बसच्या इंजिनातून धूर निघताना चालकाने पाहिले. चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवली व तातडीने...
टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन! रेगू संघाने अंतिम फेरीत जपानचा पराभव करत इतिहास रचला
भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद क्षण! टीम इंडिया पुरुष रेगू संघाने वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जपानचा दमदार पराभव करत सुवर्णपदक जिंकले आहे. हा विजय भारतासाठी ऐतिहासिक असून, भारतीय खेळाडूंनी आपल्या अप्रतिम खेळाने जगभरातील प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. अंतिम सामन्यात भारताची दणदणीत कामगिरी भारतीय संघाने अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवला आणि जपानी संघावर वर्चस्व गाजवले. भारतीय खेळाडूंच्या अचूक फटक्यांनी आणि जबरदस्त बचावाने...
‘कौल पुण्याचा’ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती; पुण्याच्या विकासासाठी भाजपचा निर्धार अधिक दृढ
पुणे : भारतीय जनता पार्टी पुणे शहरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कौल पुण्याचा’ या भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पुणेकरांचा विश्वास आणि शहराच्या विकासासाठीचा संकल्प या कार्यक्रमातून अधिक ठामपणे अधोरेखित झाला. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि...
“फक्त किरकोळ वादातून घेतला सूड! तीन वर्षाच्या चिमुरड्याचं अपहरण – आईच्या डोळ्यांत पाणी, पोलिसांच्या धडाडीमुळे मुलगा सुखरूप परतला”
लातूर – लातूर शहरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण करणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुरड्याच्या अपहरण प्रकरणाचा अखेर शेवट सुखद झाला आहे. ११ दिवसांनंतर पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईनं आरोपीला पंढरपूर येथून अटक करण्यात आली असून, चिमुकल्याला सुखरूप त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही घटना संपूर्ण शहराला हादरवून टाकणारी असून, समाजमन ढवळून टाकणारी आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? २६ मे रोजी लातूर...
पुण्यात वडा पाव घेताना दाम्पत्याचे ₹४.९५ लाखांचे सोने चोरीस, श्वेताळवाडी येथे घटना.
पुणे: श्वेताळवाडी येथे वडापाव घेताना एका दाम्पत्याचे ₹४.९५ लाखांचे सोने चोरीला गेले आहे. ही घटना गुरुवारी रोहित वडेवालेच्या दुकानाबाहेर घडली. ६९ वर्षीय तक्रारदार, जे मांजरी बुद्रुक येथील व्हाईटफिल्ड सोसायटीत राहतात, त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, उरुळी कांचन शाखेतून तारण ठेवलेले दागिने परत घेतले होते. दागिने काढल्यानंतर, ते आपल्या मोटारसायकलवर घरी परतत असताना श्वेताळवाडी येथे वडा पाव घेण्यासाठी थांबले. माहितीनुसार, त्यांनी...











