21 वा हप्ता रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.” – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
पुणे : "केंद्र सरकार व राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हफ्त्याचं वितरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यापूर्वी राज्य शासनाने ही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून भरीव रक्कम वितरित करण्याचं काम केलं आहे. या नवीन 21 व्या हप्त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना लागवड, बियाणे, उपजीविका आणि इतर कृषी खर्चासाठी...
हिंजवडीतील भीषण दुर्घटना: पंचरत्न चौकात कंपनीच्या बसखाली 5 जण चिरडले; निरागस बहीण-भावाचा जागीच मृत्यू
हिंजवडी IT पार्क परिसरात बेदरकार वाहतूक आणि निष्काळजी वाहनचालकांचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा जीवघेणे ठरले आहे. पंचरत्न चौकात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला असून रहिवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल (दि. 1) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कामगारांना घेऊन जाणाऱ्या कंपनीच्या बसचे नियंत्रण सुटल्याने हा भयावह अपघात घडला. भरधाव वेगात असलेली बस अचानक थेट फुटपाथवर चढली आणि तिथून...
‘कौल पुण्याचा’ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती; पुण्याच्या विकासासाठी भाजपचा निर्धार अधिक दृढ
पुणे : भारतीय जनता पार्टी पुणे शहरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कौल पुण्याचा’ या भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पुणेकरांचा विश्वास आणि शहराच्या विकासासाठीचा संकल्प या कार्यक्रमातून अधिक ठामपणे अधोरेखित झाला. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि...
नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप फोरम 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्स्फूर्त स्वागत!
मुंबई: बीकेसी येथे आयोजित 'नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप फोरम 2025' मध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले असता नॅसकॉमच्या टीमकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. या प्रतिष्ठित फोरममध्ये तंत्रज्ञान, नेतृत्व आणि डिजिटल परिवर्तन या विषयांवर विचारमंथन होणार असून, देशभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर तसेच आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ या मंचावर उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगाने...
गोंदिया जिल्ह्यातील अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
गोंदिया जिल्ह्यातील सीएमआर तांदूळ जमा करून ठेवल्याप्रकरणी चौकशी करण्यात येईल. तसेच या प्रकरणातील जिल्हा पुरवठा अधिकारी याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. गोंदिया जिल्ह्यातील सीएमआर तांदुळाच्या साठ्याप्रकरणी सदस्य नाना पटोले यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम यांनी माहिती देताना सांगितले की, सन २०२३–२४ या वर्षासाठी आवश्यक...
मराठी अस्मितेवर गदा? राज ठाकरेंचा गंभीर इशारा! मराठी माणसांवर अन्यायाचा आरोप
राज ठाकरे नेहमीच मराठी माणसाच्या हितासाठी सजग आणि सावधगिरीचा इशारा देत आले आहेत. सध्याच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये मराठी माणसाला दुय्यम वागणूक मिळतेय, असा आरोप पुन्हा एकदा त्यांनी केला आहे. गेल्या ४ महिन्यांमध्ये अनेक आंदोलनं झाली, पण त्या सगळ्या आंदोलनांमध्ये एक गोष्ट सतत दिसून आली – मराठी माणसाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या एका विशिष्ट पक्षाची सुस्पष्ट उपस्थिती! त्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्यांवर...
शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना नमन; कामगार हक्क आणि स्वाभिमानाचा वारसा अधोरेखित
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज मुंबईतील द सेंट रेजिस हॉटेलमध्ये भारतीय कामगार सेनेच्या वतीने भावपूर्ण अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा, कार्याचा आणि कामगार हितासाठीच्या संघर्षाचा गौरव करत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला नवनिर्वाचित नगरसेवक श्री. निशिकांत शिंदे, भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस श्री. दिलीप जाधव, युनिट अध्यक्ष श्री. विवेक करलकर, हॉटेल...
कोपरगाव तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण; २८.५० कोटींच्या अत्याधुनिक पोलीस स्टेशन इमारतीचे लोकार्पण
कोपरगाव : तालुक्याच्या कायदा व सुव्यवस्था यंत्रणेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण टप्पा आज पूर्ण झाला. तब्बल २८ कोटी ५० लक्ष रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे, कर्मचारी वसाहतीचे तसेच चार अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री Radhakrishna Vikhe Patil यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. हा प्रकल्प दिवंगत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या सहकार्यामुळे साकार झाला असल्याचे...
पुणे: स्मार्ट सिटीमध्ये पादचाऱ्यांसाठी सुरक्षा धोरण फक्त कागदावरच! १२० पादचाऱ्यांचा मृत्यू.
पुणे : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात पादचाऱ्यांची सुरक्षा मात्र अद्याप कागदावरच असल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील रस्त्यांवरील पादचाऱ्यांसाठी असलेल्या फुटपाथवर अतिक्रमण झाल्यामुळे गेल्या वर्षभरात १२० पादचाऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. फुटपाथवर अतिक्रमणाचा विळखा: पुणे शहरात सुमारे १,४०० किलोमीटर लांब रस्ते आहेत, त्यापैकी ८२६ किलोमीटर रस्त्यांवर फुटपाथच नाहीत. उर्वरित ५७४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर जरी फुटपाथ असले तरी ते...
धडाडीचे IAS तुकाराम मुंढे पुन्हा बदलीवर; महाराष्ट्र सरकारने ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या
मुंबई – महाराष्ट्र प्रशासनात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळाले असून, राज्य सरकारने पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे धडाडीचे आणि कर्तव्यकठोरतेसाठी प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचे आहे. प्रशासनात नियमांच्या अंमलबजावणीसाठी कडक भूमिका घेणाऱ्या मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. नवीन नियुक्तीचा तपशील तुकाराम मुंढे यांची असंघटित कामगार आयुक्तपदावरून...













