सामाजिक

Home सामाजिक Page 131

ACOHI ने भारतातील हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाचा मार्ग केला मोकळा

ACOHI ने भारतातील हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाचा मार्ग केला मोकळा - महाराष्ट्र राज्यासाठी प्रतिष्ठित "Culinary ID " ( Disha Global Consultancy) दिशा ग्लोबल कन्सल्टंसीला प्रदान पुणे:- भारतातील हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षण घेणे हा नेहमीच एक महत्त्वाकांक्षी स्वप्न राहिले आहे. या दिशेने एक मोठी उपलब्धी म्हणून, महाराष्ट्र राज्यासाठी प्रतिष्ठित Culinary ID  ( Disha Global Consultancy) दिशा ग्लोबल कन्सल्टंसीला प्रदान...

बदलापूर-नवी मुंबई टनेल रोड पुढील वर्षी खुला होणार; प्रवास वेळ २० मिनिटांवर येणार!

मुंबई: बदलापूर आणि नवी मुंबई यांना जोडणारा महत्त्वाकांक्षी टनेल रोड प्रकल्प पुढील वर्षी खुला होण्याच्या मार्गावर आहे. या टनेलमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, अवघ्या २० मिनिटांत बदलापूरहून नवी मुंबईत पोहोचणे शक्य होणार आहे. महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था अधिक सुकर आणि वेगवान करण्याच्या दिशेने हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. वाहतुकीस नवा पर्याय: मोठा दिलासा! सध्या बदलापूरहून नवी मुंबईला जाण्यासाठी...

“शौर्यस्थळांचा आदर, आणि तीर्थस्थळांचा वारसा जपणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!” — आलंदी येथे 450 एकर जागेत भव्य ज्ञानपीठ उभारण्याची घोषणा

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र भूमीत, आलंदी येथे 450 एकर जागेवर भव्य ‘ज्ञानपीठ’ उभारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. संत परंपरेचा गौरव वाढविण्यासाठी आणि भाविकांना अधिक सुविधा देण्यासाठी राज्य सरकारकडून ही ऐतिहासिक योजना राबविली जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, “माउलींची परंपरा ही केवळ अध्यात्माची नाही तर समाजजागृतीची आहे. म्हणूनच या पवित्र...

२०२६ कडे वाटचाल : फूड ट्रकपासून हेल्दी मेन्यूपर्यंत पुण्याचं बदलतं खाद्यविश्व; परवडणारी किंमत ठरणार निर्णायक

पुणे : शिक्षण, आयटी आणि संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराचं खाद्यविश्वही झपाट्याने बदलत आहे. २०२६ कडे पाहताना पुण्यातील फूड सीन अधिक व्यापक, वैविध्यपूर्ण आणि ग्राहक-केंद्रित होत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. आज फूड ट्रक हे केवळ एखाद्या उत्सवापुरते मर्यादित न राहता, दैनंदिन जेवणाचा अविभाज्य भाग बनत चालले आहेत. पौड रोड, बाणेर आणि विमाननगरसारख्या भागांमध्ये आठवड्याच्या कामकाजाच्या दिवसांत संध्याकाळी रस्त्यांवर उभे...

पुण्यात नवले पुलाजवळ भीषण साखळी अपघात! चालत्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबल्याने कार दोन कंटेनरमध्ये चिरडली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २० जखमी

पुणे | पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून, या अपघाताने संपूर्ण परिसरात हाहाकार माजवला आहे. गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या या भीषण घटनेत दोन कंटेनर आणि एका कारचा जबरदस्त अपघात झाला. धडकेनंतर काही क्षणातच दोन्ही कंटेनरना आग लागली आणि त्यांच्या मधोमध अडकलेल्या कारने पेट घेतला. या घटनेत आतापर्यंत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, २० हून...

दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग; भाजपच्या गटात हालचाली, पुढचे ४ दिवस ठरणार निर्णायक

नवी दिल्ली | प्रतिनिधी :- संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील चार दिवस देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १९ डिसेंबरला मोठा राजकीय भूकंप होईल, असे भाकीत केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी...

पुणे पोलिसांचा ‘मोबाईल परतावा महाअभियान’ यशस्वी – १९३ हरवलेले मोबाईल तक्रारदारांच्या हाती; नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक

पुणे – पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकाभिमुख कारभाराचे उत्तम उदाहरण घालत, परिमंडळ-१ अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांमधील हरविलेले आणि गहाळ झालेले तब्बल १९३ मोबाईल फोन त्यांच्या respective तक्रारदारांना परत केले. सी.ई.आर. (CIER) पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्रासह इतर राज्यांतून हस्तगत करण्यात आलेल्या या मोबाईल्सचे वितरण २७ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात आले. हा उपक्रम स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृह, मॉर्डन कॉलेज, शिवाजीनगर...

८ महिन्यांत ६१ हजारांहून अधिक नागरिकांना उच्च रक्तदाब, तर ३९ हजारांना डायबिटीसचा धक्का!

पुणे: वेगवान जीवनशैली, वाढता ताण आणि अनियमित आहारामुळे पुणेकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या ८ महिन्यांत तब्बल ६१,७३२ नागरिकांना उच्च रक्तदाब असल्याचे निदान झाले आहे. त्याच कालावधीत ३९,९७० नागरिकांना मधुमेह असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे आकडे शहरातील जीवनशैली किती धोकादायक पातळीवर पोहोचली आहे, याचे गंभीर चित्र समोर आणतात. शहरातील ७,२२,३२७ नागरिकांची तपासणी...

दारूच्या नशेत सिलेंडर डोक्यात मारून खून; दिघी पोलिसांनी २४ तासांत आरोपीला पकडले.

0

पुणे : आळंदीतील काळे कॉलनी परिसरात दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका मजुराने आपल्या कामगाराच्या डोक्यात सिलेंडर मारून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिघी पोलिसांनी आणि गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने अवघ्या २४ तासांत या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव: गणेश दिगंबर खंडारे (वय २५, रा. काळे कॉलनी, आळंदी) मृत व्यक्तीचे नाव: संतोष शंकर खंदारे (वय...

“सातारा पोलिसांना हवे असलेले कुख्यात आरोपी पुण्यात जेरबंद — दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची अचूक टप्प्याटप्प्याने केलेली कारवाई”

पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक–१ ने सातारा शहर पोलीस स्टेशनला हव्या असलेल्या दोन गंभीर गुन्ह्यांमधील पाहिजे आरोपीला अचूक माहिती आणि शिताफीने आखलेल्या सापळ्यात पकडले. निखील अशोक काळे (वय २२, रा. मातंग वस्ती, कोडोली, सातारा) असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध सातारा शहर पोलिसांत गंभीर कलमांखाली दोन गुन्हे दाखल आहेत. गोपनीय बातमी आणि पुणे पोलिसांचा...

Copyright ©