स्वारगेट पोलिसांची धडाकेबाज कारवाई – देशी पिस्टलने खूनाचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारास अटक, दोन अल्पवयीन ताब्यात!
पुणे शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी स्वारगेट पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण आणि प्रभावी कारवाई करत खूनाचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य आरोपीस अटक केली आहे. या धडाकेबाज कारवाईत दोन अल्पवयीन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा छडा लावला आहे. गुन्ह्याचा थरारक तपशील – जुन्या भांडणातून जीवघेणा हल्ला! दि. ४ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा थरार घडला. स्वारगेट...
यूपीच्या टोल बूथवर भारतीय सैनिकावर अमानुष हल्ला; व्हायरल व्हिडिओमुळे चार जणांना अटक.
मेरठ: उत्तर प्रदेशच्या मेरठमधील भुनी टोल बूथवर एका भारतीय सैनिकावर टोल कर्मचाऱ्यांनी केलेल्या अमानुष हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राजपूत रेजिमेंटमधील सैनिक कपिल कवड यांना टोल कर्मचाऱ्यांनी खांबाला बांधून मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. घटनेनंतर चार टोल कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. सैनिकाच्या फ्लाइटची चिंता, टोलवर झालेला वाद कपिल कवड सध्या सशस्त्र दलातील रजेवर होते आणि दिल्लीतून श्रीनगरला परतण्यासाठी...
गुजरातमध्ये दुर्दैवी घटना: चार वर्षांच्या मुलीचा सायकलवरून पडून कारखाली आल्याने मृत्यू.
मेहसाणा, गुजरात: मेहसाणाच्या एका निवासी सोसायटीमध्ये एक चार वर्षांची मुलगी, दिशा पटेल, सायकल चालवताना तोल जाऊन पडली आणि दुर्दैवाने तिच्यावर कार चढली, ज्यामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. She loses balance and falls from her cycle after seeing a car in front of her.स्पर्श व्हिला सोसायटीच्या आवारात सायकल चालवताना दिशा पटेल कार पाहताच...
“शस्त्रसंधीनंतर भारताचा स्पष्ट इशारा : ‘खबरदार, हल्ला केलात तर परिणाम भोगावाच लागेल’ – संरक्षण मंत्रालयाचा पाकिस्तानला इशारा”
नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतरही पाकिस्तानकडून चुकीची माहिती पसरवण्याचे सत्र सुरूच आहे. याच संदर्भात संरक्षण मंत्रालयाच्या वतीने एका महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांना प्रत्युत्तर देण्यात आले. या पत्रकार परिषदेला कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह, तसेच कमांडर रघू नायर हे उपस्थित होते. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी पाकिस्तानच्या लष्कराकडून करण्यात...
पुण्यात भटक्या मांजरांच्या संख्येवर नियंत्रणासाठी महापालिकेची १ कोटींची खर्ची; एका मांजरीच्या नसबंदीवर ₹१९०० खर्च.
पुणे महानगरपालिकेने भटक्या मांजरांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी २०२२ पासून मांजरांची नसबंदी व लसीकरण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेसाठी महापालिकेने मागील तीन वर्षांत तब्बल ९९ लाख ६६ हजार ५०० रुपये खर्च केले आहेत. एका मांजरीच्या नसबंदी प्रक्रियेसाठी ₹१९०० खर्च केला जातो. महानगरपालिकेच्या युनिव्हर्सल अॅनिमल वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून ही मोहीम राबविली जाते. भटक्या मांजरांना पकडून नसबंदी केल्यानंतर त्यांना लसीकरण केले...
शहरवासियांनी स्वत:च्या विकासासोबत गावाच्याही विकासावर भर दिला पाहिजे : प्रवीण दरेकर
पुणे : पोलादपूर मुळ निवासी पुणे शहरात वास्तव्यास असणाऱ्या शहरवासीयांनी आपल्या गावाची नाळ न तोडता शहरात आपल्या विकासासोबत गावाच्या ही विकासाचा विचार करावा असे प्रतिपादन पोलादपूर भूमिपुत्र प्रवीण दरेकर (आमदार- विधान परिषद, अध्यक्ष-मुंबई बँक) यांनी पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे आयेजित भव्य सत्कार समारंभात बोलत होते. पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे प्रवीण दरेकर यांच्या हस्ते माधुरीताई मिसाळ (राज्यमंत्री, महाराष्ट्र ) आणि संतोष...
“इन्स्टाग्रामवरून नायलॉन मांजा विक्रीचा प्रयत्न; पुणे पोलिसांची धडक कारवाई – दोघे अटकेत, १.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त”
पुणे : शहरात पुन्हा एकदा बंदी असलेल्या नायलॉन मांजा (Synthetic Kite String) विक्रीचे गुन्हे समोर आले असून, मुंधवा पोलीस ठाण्याच्या पथकाने इन्स्टाग्रामवरून मांजा विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांची नावे आयुष राहुल शिंदे (20) आणि यशराज विजय दिवेकर (20) अशी आहेत. दोघेही हडपसर परिसरातील रहिवासी आहेत. गोपनीय माहिती मिळताच अचूक सापळा सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज पोमन यांच्या पथकाने...
ज्ञानोबा-तुकाराम जयघोषात दुमदुमला टाळगाव-चिखली परिसर महापालिकेच्या शाळेत रंगला भक्ती, एकात्मता आणि परंपरेचा अद्भुत संगम
पिंपरी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५० वी) जयंती वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळेत भक्तिमय वातावरणात भव्य पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने टाळगाव-चिखली परिसरातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळा व महाविद्यालय परिसरातून ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत टाळ-मृदुंगाच्या गजरासह टाळ-चिपळ्यांचा नाद आणि विद्यार्थ्यांच्या अभंगांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. ‘ज्ञानोबा माऊली’ आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत सहभाग घेतला होता. महिला बचत गटांच्या सदस्यांनी, स्थानिक समाजसेवकांनी, वारकरी बांधवांनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली. वारकरी परंपरेतील पालखी सोहळा जसा श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे, तसाच तो एकात्मता आणि सामाजिक बंध दृढ करणारा सोहळा ठरला. पालखी सोहळ्याचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, समाज विकास विभाग उपायुक्त ममता शिंदे, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण कुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपिठाचे संचालक ह. भ. प. राजू महाराज ढोरे ,डॉ. स्वाती मुळे आणि शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यांच्या नियोजनामुळे आणि समन्वयामुळे संपूर्ण मिरवणूक सोहळा शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.
मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय – जलसंपदा प्रकल्पांना मोठी मंजुरी, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात बदल!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (11 फेब्रुवारी) मुंबईत मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या पाणीपुरवठा आणि सिंचन व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातही मोठे बदल करण्यात आले आहेत. 🔷 जलसंपदा विभागाचे महत्त्वाचे निर्णय:1️⃣ देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्प – ₹2599.15 कोटी मंजूर!📍 विक्रमगड, जि. पालघर येथे होणाऱ्या या प्रकल्पासाठी मंत्रिमंडळाने सुधारित खर्च मंजूर केला...
वारकरी संप्रदायाचा आत्मिक महोत्सव: वारी म्हणजे आनंदाचा चिरंतन शोध!
पंढरपूर, पुणे | आषाढी वारी विशेष प्रतिनिधी :- सुख कोणाला सापडले? या प्रश्नाचे उत्तर शोधताना माणूस आयुष्यभर धावपळ करतो, पण समाधान मिळत नाही. सुखाच्या शोधात अनेक जण प्रपंचात इतके अडकतात की त्यांचा प्रवास एका कोल्ह्याला जुंपलेल्या बैलासारखा होतो — पुढे-पुढे चालत राहतो, पण ठिकाण बदलत नाही. परंतु, संतांनी दाखवलेला वारीचा मार्ग हा फक्त पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन मिळवण्यासाठी नव्हे, तर...

















