0
0
0
0
0

महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 120

अलिबागमध्ये स्पा सेंटरच्या आड सुरु होता देहविक्रीचा गोरखधंदा; SP रायगड अंचल दलाल मॅडम यांनी तात्काळ कारवाई करून गोरखधंद्याचा पर्दाफाश केला!

अलिबाग | रायगड – अलिबाग शहरातील एका स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर देहविक्री व्यवसायावर SP अंचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड पोलीसांनी तातडीने कारवाई करत मोठा धडक छापा टाकला. या कारवाईत काही महिलांची सुटका करण्यात आली असून दोन दलाल अटकेत आहेत. अंचल दलाल मॅडम यांची तत्परता; कारवाईने खळबळ गोपनीय माहितीच्या आधारे SP अंचल दलाल मॅडम यांनी आपल्या पथकाला निर्देश देऊन...

पुणेकरांसाठी मोठा दिलासा! वनाज़-चांदणी चौक व रामवाडी-वाहतूक वाघोली मेट्रो मार्गाला केंद्र सरकारची मंजुरी

वाहतुकीला मिळणार गती, जीवन होणार सुकर – अजित पवार पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील दोन महत्वाच्या मार्गांना केंद्र सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. वनाज़ ते चांदणी चौक (मार्गिका २ अ) आणि रामवाडी ते वाघोली-विट्ठलवाडी (मार्गिका २ ब) या दोन्ही मार्गांच्या कामांवर आता लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. पुण्याचा वेगाने वाढणारा शहरी विस्तार, वाढते वाहतूकभार, आणि पर्यावरणीय दृष्टीने मेट्रो सेवा...

राज्यातील वीज ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय! घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक वीज दरात ५ वर्षांत २६% कपात; मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली मोठी घोषणा

मुंबई | राज्यातील वीज ग्राहकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. महावितरणने सादर केलेल्या वीजदर कपातीच्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (MERC) ने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आगामी पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने वीज दरात तब्बल २६ टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे. पहिल्या वर्षातच ग्राहकांना १०% दर कपात मिळणार आहे. घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक या तिन्ही प्रकारच्या ग्राहकांना या निर्णयाचा थेट...

महालक्ष्मी पुलासाठी नियोजित दोन आरओबींपैकी एकाच कामाला गती, दुसरा प्रलंबित; नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास कायम | BMC पुढे काय?

मुंबई | ब्रिटिश काळात बांधलेला महालक्ष्मी स्थानकावरील आरओबी (रेल्वे ओव्हर ब्रिज) आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असतानाच, त्याच्या पर्यायी दोन पुलांची योजना गेल्या दहा वर्षांपासून रेंगाळतच आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दोन्ही पुलांचे काम 2020 मध्ये मंजूर केले असले तरी, सध्या केवळ एकाच पुलाचे काम सुरू आहे. फक्त एकच पूल कार्यान्वित – दुसरा अजून कागदावरच ● सध्या केवळ केशवराव खाड्ये मार्ग (KK मार्ग)...

“भगिनी स्व. ऋतुजा राजगे यांना न्याय मिळालाच पाहिजे”; धर्मांतरासाठी दिलेल्या छळामुळे सात महिन्यांच्या गर्भवतीचा आत्महत्या करून अंत

सांगली | संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या गर्भवती स्व. ऋतुजा सुकुमार राजगे आत्महत्या प्रकरणावर आता सामाजिक आणि राजकीय पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भोसरीचे आमदार महेश लांडगे दादा यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दांत म्हटलं की, "भगिनी ऋतुजाला धर्मांतरासाठी छळलं गेलं, हा केवळ कौटुंबिक मुद्दा नाही, तर हा आमच्या संस्कृतीवर घाला आहे. या प्रकरणात कठोरात कठोर शिक्षा झालीच...

पुणे मनपा हद्दीतील २३ गावांसाठी मुंबईत विशेष बैठक; विकास निधी, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वसुली व कर्मचारी पुर्नसेवेवर महत्त्वाचे निर्णय

 पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या प्रलंबित प्रश्नांवर आज सह्याद्री अतिथीगृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक नागरी सुविधा, विकासकामे, कर्मचारी समस्या आणि आर्थिक नियोजनासंबंधी अनेक ठोस निर्णय घेण्यात आले. राज्य सरकारने पुणेकर नागरिकांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत, एकूण १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची घोषणा केली. विकासासाठी आर्थिक पाठबळ – फुरसुंगी आणि उरुळी देवाची या नवीन नगर परिषदेच्या...

निम्म्या वर्षाची चिंता मिटली! पवना धरणाने पार केली पन्नाशी; पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा, मावळातील गावांनाही पिण्याच्या पाण्याची खात्री

पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. पवना धरणात पाणीसाठा ५१.३४% इतका पोहोचल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. यामुळे शहर आणि परिसरातील निम्म्या वर्षाच्या पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे. मंगळवारी (२४ जून) सायंकाळी चार वाजता घेतलेल्या नोंदीनुसार, धरण परिसरात २४ तासात २६ मिमी इतका पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाचा जोर आणि धरणातील वाढता साठा – गेल्या...

पुण्यात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! आणखी ५ नवीन सायबर पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव; पोलीस दलात एक हजार अधिक कर्मचाऱ्यांची भरती आवश्यक – आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

पुणे शहरात सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत असतानाच, पुणे पोलीस दलाने मोठा निर्णय घेत आणखी पाच नवीन सायबर पोलीस ठाण्यांची मागणी केली आहे. सध्या शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यावर प्रचंड तक्रारींचा भार असल्यामुळे, नागरिकांची तक्रार नोंदवण्याची व तपासाची प्रक्रिया संथ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे औपचारिक प्रस्ताव सादर करण्यात आला...

सांगलीत भीषण अपघातात नवविवाहितेचा जागीच मृत्यू; पती गंभीर जखमी – नव्या आयुष्याची सुरुवात होण्याआधीच काळाने हिरावलं स्वप्न

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक अपघात घडला आहे. नुकतीच लग्न झालेल्या नवविवाहितेचा जागीच मृत्यू झाला असून, तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. एका भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. नवविवाहितेच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून, संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेचा तपशील – ही दुर्घटना सांगली जिल्ह्यातील येरळा घाटाच्या परिसरात घडली. नवविवाहित जोडपं दुचाकीवरून जात...

माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजितदादांचा निळकंठेश्वर पॅनल विजयी! 21 पैकी 20 जागांवर दणदणीत यश; युवा नेते यश साने व पंकज भालेकर यांची अभिनंदन भेट

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बहुचर्चित आणि राज्याचे लक्ष वेधून घेणारा निकाल अखेर जाहीर झाला असून, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलने तब्बल 21 पैकी 20 जागा जिंकत प्रचंड दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालामुळे अजित पवारांचे सहकार क्षेत्रातील वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले असून, विरोधी शरद पवार यांच्या बळीराजा पॅनलला एकही जागा मिळवता आली नाही. या विजयामुळे संपूर्ण बारामती परिसरात...

Copyright ©