महाराष्ट्र
महाराष्ट्र भाजपाचे नवे अध्याय! श्री. रवींद्र चव्हाण यांची नूतन प्रदेशाध्यक्षपदी निवड — भाजप कडवटपणे संघटित होणार!
मुंबई : श्री. रवींद्र चव्हाण यांच्या नावाची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी अधिकृत घोषणा झाली असून, राज्याच्या राजकीय वर्तुळात ही बातमी मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात येत आहे. त्यांचं नाव जाहीर होताच विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सामान्य कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांचं मत एकच — "रवींद्र चव्हाण यांचं नेतृत्व म्हणजे संयम, नियोजन, अनुभव आणि भाजपाच्या मूल्यांचा संगम." लोकप्रतिनिधी ते प्रदेशाध्यक्ष...
मोठा घोटाळा टळला! महाराष्ट्र PWD विभागाच्या खात्यातून 111 कोटींचा फ्रॉड करण्याचा प्रयत्न उधळला
महाराष्ट्रात पुन्हा एकदा सरकारी खात्यावर मोठ्या आर्थिक घोटाळ्याची सावली दाटलेली असताना, सतर्क अधिकाऱ्यांनी वेळेवर कारवाई करून तब्बल 111 कोटी रुपयांचा मेगा फ्रॉड थांबवण्यात यश मिळवले आहे. ही कारवाई केवळ आर्थिक नुकसान टाळणारी नाही तर राज्यातील सायबर सुरक्षेच्या धोक्यांवर मोठा प्रकाश टाकणारी ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही अज्ञात सायबर गुन्हेगारांनी महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकृत खात्यात हॅक करून मोठी रक्कम...
दिवाळीत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छतेसाठी विशेष मोहीम
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने दिवाळी काळात कचरा संकलनासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी २० ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२५ या चार दिवसांच्या काळात तब्बल ५ हजार ६५८ टन कचरा संकलित केला आहे. दिवाळीच्या काळात घराघरात करण्यात येणारी साफसफाई , बाजारपेठांतील गर्दी, फटाक्यांचा कचरा आणि सजावटीसाठी वापरले जाणारे साहित्य यामुळे शहरातील कचऱ्याचे प्रमाण नेहमीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढण्याची...
ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने देशाने गमावला एक संयमी, सुसंस्कृत आणि दूरदर्शी नेता
ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक अढळ, संतुलित आणि मूल्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व हरपले आहे. देशाच्या राजकीय, सामाजिक आणि संसदीय क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाचा पट अत्यंत व्यापक आणि प्रेरणादायी आहे. शांत, सौम्य वर्तन, विचारांची परिपक्वता आणि निर्णयक्षम नेतृत्व या त्यांच्या ओळखीच्या खास वैशिष्ट्यांनी त्यांना देशातील सर्वपक्षीय आदर प्राप्त करून दिला होता. आमदार, खासदार, महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष, लोकसभेचे...
“राज्यसेवेतील खेळाडूंना न्याय मिळालाच पाहिजे!” – आमदार अमित गोरखे यांची विधान परिषदेत जोरदार मागणी; उच्चस्तरीय बैठकीची गरज अधोरेखित
मुंबई, विधान भवन :- राज्य शासनाच्या विशेष कोट्यातून थेट नियुक्त झालेल्या आणि देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना गेल्या १२ वर्षांपासून शासनाच्या मूलभूत लाभांपासून वंचित ठेवले जात असल्याने, विधान परिषदेत आमदार अमित गोरखे यांनी या अन्यायाविरुद्ध जोरदार आवाज उठवला. गोरखे यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक घेण्याची मागणी करत स्पष्ट सांगितले की, "खेळाडूंना सन्मान मिळालाच पाहिजे. त्यांनी देशासाठी योगदान दिले असून त्यांच्यावर...
पुणे पोलिसांची दोन्ही ठिकाणी मोठी कारवाई; विमानतळ आणि भारती विद्यापीठ परिसरात११ लाखांची संपत्ती जप्त
पुणे शहरातील विमानतळ पोलीस स्थानक आणि भारती विद्यापीठ परिसरात पोलिसांनी दोन्ही ठिकाणी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण १७ आरोपींना अटक करण्यात आली असून ११ लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. या पुणे शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना मोठा यश मिळाले आहे. विमानतळ पोलीस स्थानकाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अंतर्गत एका...
विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन- राज्यपाल आचार्य देवव्रत
पुणे : विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन असून नैसर्गिक व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर येथून ऑनलाइन पद्धतीने वितरण झाले. या कार्यक्रमास कृषी महाविद्यालय पुणे येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे...
लक्ष्मीनगर पोलिसांची मोठी कारवाई; हातभट्टी गाळण करून गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांचा पूर्ण नायनाट
पुणे शहरात अवैध दारू व्यवसायावर कडक कारवाईचा धडाका सुरू असतानाच लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने हातभट्टी गाळण करून गावठी दारू तयार करणाऱ्या ठिकाणांवर मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले असून परिसरातील बेकायदेशीर दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी शहरातील अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर प्रभावी व सातत्यपूर्ण...
मुंबईच्या प्रवेशद्वारावर दहिसर टोल प्लाझा परिसरात खड्ड्यांचा फज्जा; नाईक फॅक्टरी आउटलेटजवळ नागरिकांची गैरसोय
मुंबई :- भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच दहिसर टोल प्लाझा परिसरात, नाईक फॅक्टरी आउटलेटजवळ खड्डे भरण्याच्या कामाचा विचित्र आणि निष्काळजी नमुना पाहायला मिळाला आहे. खड्डे भरण्याऐवजी ते जणू औपचारिकता म्हणून भरले गेले असून, पावसाच्या पाण्यामुळे आणि अवजड वाहनांच्या दाबामुळे पुन्हा उखडले आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांचा संतापदररोज हजारो वाहनांची वर्दळ...
पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची भेट – सिम्बायोसिस विद्यापीठातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे निरीक्षण
पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे येथे स्थापन करण्यात आलेल्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ या अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना आणि युवकांना आधुनिक तंत्रज्ञान, इंडस्ट्री 4.0 आणि डिजिटल स्किल्सच्या क्षेत्रात उत्कृष्ट प्रशिक्षण दिले जाणार आहे. या दौऱ्यात दोन्ही मान्यवरांनी केंद्रातील प्रयोगशाळा,...











