‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद; ३.२६ लाख नागरिकांची मोफत तपासणी, ६,८६२ रक्तदात्यांनी दिले योगदान
मुंबई | गणेशोत्सवासारख्या लोकाभिमुख आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या उपक्रमाला राज्यभरातून अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमामुळे लाखो नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीची संधी मिळाली, तर हजारो नागरिकांनी रक्तदान करून समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. अभियानाचा कालावधी आणि राबविण्यात आलेली शिबिरे २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ दरम्यान राज्यातील सर्व...
मुंबईमध्ये आज संध्याकाळनंतर वादळी पावसाची शक्यता; आठवडाभर ढगाळ हवामान कायम राहणार!
मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, मुंबईत आज दुपारीपर्यंत उष्ण व दमट हवामान राहणार असून, संध्याकाळनंतर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या संपूर्ण आठवड्यात ढगाळ हवामान व हलक्याफारक्य पावसाच्या सरी मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहेत. आजचं हवामान : सकाळी उष्णता, संध्याकाळी गडगडाटासह पाऊस १२ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मुंबईत ३१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद...
पनवेल तालुका ठाण्यांतील पोलिस करतात काय? लायसन्स च्या नावाखाली बेकायदा धंद्यांविरोधात सक्रिय पणे त्या ठिकाणी कारवाई करणार आहेत का नाही ❓❓❓
सदर पनवेल तालुका पोलीस स्टेशन हदीतील नावाजलेल्या कोण गाव येथील नाईट रायडर, नटराज ह्या लेडीस डान्स बार मध्ये अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट, नियम धाब्यावर ठेऊन नाबालिक आणि नोकरनामा नसलेल्या मुलींना बार मध्ये पाचरण करून त्यांना नाचवून त्यांच्या वर बार मालक लाखो रुपयाची उधळण करून घेत असून , सदरच्या ठिकाणी दारू, बीअर , आवाच्या सवा किंमतीत विक्री केली जात असून लोकांची...
मुंबईत BMC चा प्रकल्प बुडाला! अंधांसाठी टाकलेल्या टॅक्टाईल टाईल्स अवैध पार्किंगमुळे तुटल्या – Horniman Circle परिसरात बेशिस्त वाहनधारकांचा कहर
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहराला पादचारी-मैत्रीपूर्ण बनवण्यासाठी ‘पादचारी प्रथम’ धोरणांतर्गत लाखो रुपये खर्च करून केलेले काम पुन्हा एकदा निष्काळजीपणामुळे वाया जाण्याच्या मार्गावर आहे. फोर्ट परिसरातील Horniman Circle Garden जवळ शाहिद भगतसिंह रोडवर अंध व्यक्तींना चालताना मार्गदर्शन मिळावे म्हणून टाकलेल्या टॅक्टाईल टाईल्स फक्त एका वर्षातच मोडकळीस आल्या आहेत. अवैध पार्किंगमुळे झाला ऱ्हासBMC च्या A वॉर्ड कार्यालयाबाहेर, RBI मुख्यालयासमोर आणि इतर...
गणरायाला भावपूर्ण निरोप; पुढील वर्षीच्या आगमनाची उत्सुकता सुरूच
मुंबई | दहा दिवसांच्या भक्तिमय वातावरणानंतर आज गणेशोत्सवाची सांगता झाली. “निरोप घेण्याची वेळ आली, आता पुढल्या वर्षीच्या भेटीची आस लागली…” अशा भावनिक स्वरात भाविकांनी बाप्पाला निरोप दिला. “गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!” या गजराने संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमून गेला. श्रद्धा आणि भक्तीचा मिलाफदहा दिवस घराघरांत पूजाअर्चा, आरत्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण मंगलमय झाले होते. आजच्या विसर्जन मिरवणुकीत भक्तांनी अश्रूंनी...
पेट्रोल डिझेल किंमत: सरकारने सामान्य लोकांना दिले गिफ्ट! कमी केले पेट्रोल डिझेलचे दर
मुंबई परिसरासाठी महाराष्ट्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या: तपशील जाणून घ्या मुंबई परिसरातील इंधन दर कमी करण्याचा निर्णय ४४ लाख महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे वीज बिल माफ आणि गरीब कुटुंबांना दरवर्षी तीन मोफत एलपीजी सिलिंडर देण्याच्या वचनासह घेण्यात आला आहे. महाराष्ट्राने मुंबई परिसरात डिझेलच्या किमती प्रति लिटर २ रुपये आणि पेट्रोलच्या किमती प्रति लिटर ६५ पैसे कमी केल्या आहेत, असे उपमुख्यमंत्री...
इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर होणार! दुपारी १ वाजता ‘या’ ९ संकेतस्थळांवर उपलब्ध; निकालानंतर गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनाचीही सुविधा
मुंबई / पुणे : अखेर प्रतीक्षेच्या क्षणांना आज विराम मिळणार आहे! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज मंगळवार, १३ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी याबाबत माहिती दिली आहे. नववी विभागीय मंडळांचा समावेश या परीक्षेत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई,...
“प्रत्येकाला आपल्या मातृभाषेविषयी आपुलकी असते… महाराष्ट्रात मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे” – अजित दादांचा ठाम निर्धार
मुंबई – “मराठी ही महाराष्ट्राच्या मातीची ओळख आहे. इथे राहणाऱ्यांनी मराठी भाषा बोलणं केवळ गरजेचं नाही, तर ही आपली जबाबदारी आहे,” असे ठाम उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना काढले. त्यांच्या या विधानामुळे मराठी भाषेच्या महत्त्वावर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे. अजित दादा पुढे म्हणाले, “प्रत्येकालाच आपल्या मातृभाषेविषयी प्रेम, अभिमान आणि आत्मीयता असली पाहिजे. आपण ज्या भूमीत राहतो,...
मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार एन्ट्री! पुढील ५ दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, चाकरमान्यांची तारांबळ
मुंबई | मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपली! आज सकाळपासूनच मुंबई शहर आणि उपनगरात रिमझिम पावसाने हजेरी लावली असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. हवामान खात्याचा पाऊसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पुढील काही तासांमध्ये कोसळणार आहे. यासोबतच वादळी वाऱ्यांचा इशाराही दिला असून,...
मुंबईसाठी दिलासा! मुसळधार पावसामुळे तलावांच्या जलसाठ्यात वाढ; साठा २५.१७ टक्क्यांवर
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा वाढून २५.१७ टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने दिली आहे. शहराच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात कमी झाली असली, तरी अजूनही समाधानकारक साठा होण्यासाठी पुढील काही दिवस पावसाची गरज भासत आहे. सध्या तलावांमध्ये किती पाणीसाठा आहे?BMC च्या २० जून रोजीच्या अहवालानुसार, ३,६४,२३३ मिलियन...










