Breaking News
सामाजिक सौहार्दाचे दर्शन – विविध शुभविवाह व साखरपुडा समारंभांना मान्यवरांची उपस्थिती
सामाजिक बांधिलकी आणि आपुलकीचे नाते अधिक दृढ करणाऱ्या विविध मंगलप्रसंगी उपस्थित राहण्याचा योग लाभला. श्री. अशोक राजेघोरपडे यांच्या कन्येच्या शुभविवाह सोहळ्यानिमित्त देविका द प्राईड डेस्टिनेशन, वाढे फाटा येथे उपस्थित राहून नवदांपत्याला आशीर्वाद दिले. त्याचप्रमाणे श्री. शेषन माळी यांच्या कन्येच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी विठ्ठल मंगल हॉल येथे उपस्थित राहून भावी दाम्पत्याला शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच डॉ. सुधाकर लावंड यांच्या पुत्राच्या शुभविवाह सोहळ्यानिमित्त...
मुंबईत कर्णाक पूलाच्या कामाला पुन्हा गती! १.८ कोटींची दंडात्मक कारवाई; जुन्या पूलाच्या जागी नवा आधुनिक पूल लवकरच
मुंबई :- मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी! तब्बल पंधरा दिवसांच्या विलंबानंतर कर्णाक पुलाच्या बांधकामास पुन्हा सुरूवात झाली आहे. दरम्यान, विलंब झाल्यामुळे ठेकेदारावर १.८ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आता महापालिकेने स्पष्ट केलं आहे की, निर्धारित वेळेत म्हणजेच १० जूनपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. 'गर्डर्स' विलंबामुळे काम ठप्प, पण आता पुन्हा सुरळीत • एप्रिल ३० पर्यंत 'स्टील गर्डर्स' पोहोचणे अपेक्षित होते,...
पुणे मेट्रो स्थानकांचे नाव बदलणार, १०-१५ दिवसांत होणार कार्यवाही – सविस्तर माहिती जाणून घ्या.
महा मेट्रोने मागील वर्षी भोसरी, बुधवार पेठ आणि मंगळवार पेठ स्थानकांची नावे बदलण्याचे प्रस्ताव दिले होते. मात्र, हे प्रस्ताव अद्याप केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, येत्या १०-१५ दिवसांत पुणे मेट्रोच्या तीन स्थानकांची नावे प्रवाशांच्या मागणीनुसार बदलली जाणार आहेत. नाव बदलल्यानंतर स्थानकांची नवीन नावे काय असतील? पहिल्या मार्गिका (कॉरिडोर वन) वरील पिंपरी-चिंचवडच्या भोसरी स्थानकाचे नाव बदलून नाशिक...
डोंबिवलीच्या वीर पुत्रांना अश्रूपूरित श्रद्धांजली; सहस्रोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित
डोंबिवली – एक शोकाकुल आणि हृदयद्रावक क्षण: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन नागरिक, अतुल मोणे, संजय लेले आणि हेमंत जोशी यांना आपले प्राण गमवावे लागले. मंगळवारी झालेल्या हल्ल्यानंतर आज त्यांच्यावर डोंबिवली दत्तनगर येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. या अंतिम निरोपाच्या क्षणी संपूर्ण डोंबिवली शहर हळहळून गेले. बागशाळा मैदानावर ठेवले गेले अंत्यदर्शनासाठी पार्थिव:संध्याकाळच्या सुमारास डोंबिवलीतील बागशाळा...
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी वानखेडे स्टेडियम सज्ज; शपथविधी २५ नोव्हेंबर रोजी.
महाराष्ट्राच्या विधानसभेत महायुतीचा दणदणीत विजय; शपथविधी सोहळा वानखेडे स्टेडियमवर २५ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप नेतृत्वाखालील महायुतीने (भाजप, शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी) मोठा विजय मिळवला आहे. यानंतर २५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शपथविधी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्रिपदावर अनिश्चितता कायम; महायुतीत नेतृत्वाचा अंतिम निर्णय प्रलंबित महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवून सरकार स्थापनेसाठी सज्जता दाखवली असली, तरी...
“एकतर्फी प्रेमातून मुलीची निर्घृण हत्या, पिंपरी-चिंचवड पोलिसांची अवघ्या १२ तासांत आरोपीला अटक”
पिंपरी-चिंचवड, ३० जुलै २०२४: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकतर्फी प्रेमातून मुलीची हत्या करण्यात आली आहे. आरोपीने लग्नाला नकार दिल्यामुळे तिचा गळा चिरून हत्या केली. ही घटना काल रात्री ११ वाजता खेड तालुक्यातील अंबेठाण गावात घडली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी १२ तासांच्या आत आरोपीला अटक केली. मृत प्राची विजय माने (वय २१) हिची ओळख पटली असून ती अंबेठाण येथील रहिवासी व मूळची सांगली...
महाराष्ट्राच्या औद्योगिक क्रांतीला वेग; युनिडोसोबत महत्त्वाचे करार, एमएसएमईंना मिळणार तंत्रज्ञानाची बळकटी
मुंबई: महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या इतिहासात आज एक महत्त्वाचा टप्पा टापण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने संयुक्त राष्ट्रांच्या औद्योगिक विकास संस्था (UNIDO) यांच्यासोबत एक ऐतिहासिक हेतुपत्रावर (Letter of Intent) स्वाक्षरी केली. या करारांतर्गत मुंबई किंवा पुणे येथे एक 'सेंटर ऑफ एक्सलन्स' (CoE) स्थापन करण्यात येणार आहे, जो...
“घड्याळाचा गजर, विकासावर नजर!” – प्रभाग २५ (क) मधून राधिका कुलकर्णींचा निर्धार
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (क) – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई परिसरात विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याचा संकल्प घेऊन ॲड. राधिका उल्हास कुलकर्णी मैदानात उतरल्या आहेत.“सर्वांच्या विकासासाठी एक मत – राधिका साठी!” हा केवळ नारा नसून, सर्वसामान्यांच्या मनातील अपेक्षांचा आवाज बनत आहे. विश्वासाचं नातं जपणारा उमेदवार म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या राधिका कुलकर्णी यांनी प्रभागातील...
अंजनगाव सुर्जी नगर परिषद निवडणूक प्रचारात शिवसेनेची शक्तिप्रदर्शन रॅली; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अंजनगाव सुर्जी, अमरावती |अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने आज काढण्यात आलेल्या विराट प्रचार रॅलीला नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तनाची गरज असून, हे परिवर्तन केवळ शिवसेनेच्या माध्यमातूनच शक्य आहे, असे आवाहन यावेळी मतदारांना करण्यात आले. प्रचार रॅलीदरम्यान शहरातील प्रमुख रस्त्यांवर नागरिकांनी फुलांची उधळण करत शिवसेना नेत्यांचे जल्लोषात स्वागत केले. लाडक्या बहिणींनी रॅली थांबवून...
महाराष्ट्रातील रस्त्यांची दुरावस्था; जनतेचा संताप उफाळला – “विकासाच्या गप्पा आणि रस्त्यांवरील खड्डे!”
महाराष्ट्रात सध्या सर्वत्र रस्त्यांची दुरवस्था झालेली दिसून येते. शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत खड्ड्यांनी भरलेले रस्ते हे जनतेच्या दैनंदिन जीवनातील मोठं संकट बनले आहेत. वाहतूक कोंडी, अपघात, आणि जीवितहानी या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, या परिस्थितीसाठी केंद्र आणि राज्य सरकारमधील प्रमुख नेते जबाबदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील...









