0
0
0
0
0

Breaking News

Home Breaking News Page 243

सूर्यकुमार आणि फिरकीपटूंच्या कमालीने गंभीर युगाची सुरुवात, भारताची मोठी विजयाची नोंद.

भारताने श्रीलंकेचा ४३ धावांनी पराभव करत तिन्ही सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी२० सामना जिंकला. पालेकेले इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, पालेकेले येथे शनिवारी, २७ जुलै रोजी झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारताने श्रीलंकेचा ४३ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करत भारताने २० षटकांत २१३/७ धावा केल्या, ज्यात कर्णधार सूर्यकुमार यादवच्या तुफानी अर्धशतकाने (५८ धावा, २६ चेंडू) महत्त्वाची भूमिका बजावली. श्रीलंकेच्या मथीशा पथिरानाने ४ षटकांत ४०...

प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदारी अत्यावश्यक -राज्य मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे

मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवेतील २०२४ च्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी राज्य मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांची मुख्य माहिती आयुक्त कार्यालयात भेट घेऊन संवाद साधला. या भेटीदरम्यान श्री. राहुल पांडे यांनी माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शासन व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढीस लागल्याचे सांगितले. राज्य मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे म्हणाले, महाराष्ट्र राज्यात इतर राज्यांप्रमाणे एकच आयोग नसून प्रत्येक महसूल विभागासाठी स्वतंत्र माहिती आयोग कार्यरत आहे. यामुळे नागरिकांना विभागीय...

पुणे: जैन भक्ताचा वेष धारण करणाऱ्या चोरट्याला दोन आठवड्यांच्या तपासानंतर अटक.

पुणे – स्वर्गटे पोलिसांनी एक मोठा तपास यशस्वीपणे पूर्ण करून जैन मंदिरातून सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या चोरट्याला अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी चौकशीतून महत्त्वपूर्ण माहिती मिळवली आणि चोरीला समर्पित आरोपीला गीरगाव, मुंबईतून पकडले. ही चोरी जय पारेख यांच्या घरात झालेली होती, जे सिटीवूड सोसा, पुणे येथील फ्लॅट नंबर 901 मध्ये राहतात. त्यांची सोन्याची मुकूट आणि सोन्याची माळ चोरीला...

वाढवण बंदर आणि मेगा प्रकल्पांविरोधात पालघरमध्ये जनआंदोलन – जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नागरिकांचा ठाम लढा

पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन पार पडले. प्रस्तावित वाढवण बंदर तसेच जिल्ह्यातील विविध मेगा प्रकल्पांविरोधात स्थानिक नागरिकांनी एकत्र येत आपला रोष व्यक्त केला. या आंदोलनात मच्छिमार, आदिवासी, शेतकरी, कामगार, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, वाढवण बंदर, प्रस्तावित विमानतळ, मुरबे बंदर, केळवे टेक्सटाईल पार्क आणि ‘चौथी मुंबई’ यांसारख्या प्रकल्पांमुळे...

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: शूटर शिवाच्या चौकशीत मोठे धक्कादायक खुलासे; पुण्यातील बड्या नेत्यावर शुभम लोणकरची नजर!

मुंबई: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मुख्य आरोपी शूटर शिवकुमारने पोलिस चौकशीत अनेक खळबळजनक माहिती दिली आहे. त्यानुसार, हत्या घडवून आणल्यानंतर शिवकुमार घटनास्थळीच थांबून होता आणि त्यानंतर लिलावती रुग्णालयात जाऊन ३० मिनिटे थांबून सिद्दीकींच्या मृत्यूची खात्री केली. आता, चौकशीत आणखी मोठा खुलासा झाला आहे—बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरने पुण्यातील एका बड्या नेत्याला...

बिजनेसमधील नुकसानीच्या कारणावरून पार्टनरने व्यवसायिकाचा अपहरण केला; मुंबईतून अपहरण करून पुण्यातून पोलीसांनी मुक्त केले, ३ आरोपी अटकेत

३० वर्षीय कपडा व्यापारी हेमंत कुमार रावल याचा २२ जुलै रोजी तीन लोकांनी मिळून अपहरण केला. पोलिसांनी या प्रकरणात कपूरम घांची, प्रकाश पवार आणि गणेश पात्रा यांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी एक कपडा व्यापारी अपहरणकर्त्यांपासून सुरक्षित सोडवून त्याला बरामद केले आहे, तसेच या प्रकरणात तीन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी किडनॅप झालेल्या व्यापारीला १२ तासांच्या आत पुण्यातून सुरक्षितपणे सोडवले....

आत्मनिर्भर भारतासाठी मोठे पाऊल! इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून २२,९१९ कोटींची भरीव मदत

नवी दिल्ली – भारताला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने तब्बल २२,९१९ कोटी रुपयांच्या निधीसह इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजनेला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे भारतातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात मोठी क्रांती घडेल आणि भविष्यातील वैश्विक तंत्रज्ञान क्षेत्रात देशाला महत्त्वाचे स्थान मिळवून देईल. मोठी गुंतवणूक, भरघोस उत्पादन आणि हजारो रोजगार निर्माणाचा संकल्प! या योजनेच्या माध्यमातून तब्बल ५९,३५०...

पुणे-नागपूर ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचा वेगवान प्रवास! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १० ऑगस्ट रोजी होणार उद्घाटन

पुणे, ७ ऑगस्ट २०२५ : पुणेकर आणि नागपूरकरांसाठी एक दिलासादायक आणि ऐतिहासिक बातमी आहे! पुणे-नागपूर दरम्यान "वंदे भारत एक्सप्रेस" सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला असून, याचे उद्घाटन १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ही गाडी फडणवीसांच्या मतदारसंघाशी थेट जोडणारी असल्याने राजकीयदृष्ट्याही या सेवेचे महत्त्व अधिक आहे. वंदे भारत चे वैशिष्ट्ये: ९:५० सकाळी नागपूरहून सुटणार आणि रात्री...

“बुलढाणा बस आग: बुलढाण्यात खाजगी बसला भीषण आग; ४८ प्रवासी थोडक्यात बचावले”

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातल्या मेहकर फाट्यात येथे सोमवारी (ता २४) रात्रीच्या सुमारास एका खाजगी लक्झरी बसने अचानक पेट घेतला. या बसमधून तब्बल ४८ प्रवासी प्रवास करीत होते. आग लागल्याचं कळताच प्रवाशांनी वेळीच बाहेर पडून कसाबसा आपला जीव वाचवला. क्षणार्धात आगीचा भडका उडाल्याने बस पूर्णत: जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु प्रवाशांच्या साहित्यासह संपूर्ण बस जाळून...

“एस. जयशंकर यांनी परराष्ट्रमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली; ट्वीटद्वारे मोदीजींचे आभार मानले – पाकिस्तान, मालदीव आणि चीनच्या मुद्द्यांवर उपाययोजना करण्याचा निर्धार”

डॉ. एस. जयशंकर यांनी ११ जून रोजी मोदी ३.० मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटले की, परराष्ट्र मंत्रालयाचे नेतृत्व करण्याची पुन्हा एकदा जबाबदारी मिळणे हे अत्यंत सन्मानाचे आहे. पुढील ५ वर्षांत पाकिस्तान आणि चीनबरोबरच्या भारताच्या संबंधांबाबत डॉ. जयशंकर यांनी सांगितले की, पाकिस्तान आणि चीनच्या बाबतीत संबंध वेगळे आहेत आणि तेथील समस्याही वेगळ्या आहेत. पुढे त्यांनी सांगितले...

Copyright ©