शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या ‘जनआक्रोश’ मोर्च्याने छत्रपती संभाजीनगरात सरकारवर दंड ठोकला; विवादित मंत्र्यांच्या बर्खास्तीची मागणी.
छत्रपती संभाजीनगर: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 'जनआक्रोश' मोर्च्याने सोमवारी छत्रपती संभाजीनगरात जोरदार निदर्शने केली. महायुती सरकारमधील "घोटाळेबाज मंत्र्यांना ताबडतोब बर्खास्त करा" अशी मागणी करत हा निषेध मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातील इतर शहरांमध्येही समांतर निदर्शने झाली. प्रमुख मागण्या आणि निषेधाची पार्श्वभूमी: "घोटाळ्यांच्या आरोपांमुळे मंत्रिमंडळातील काही जण अयोग्य" – उद्धव गटाच्या नेत्यांनी सरकारवर तीव्र टीका केली. महाराष्ट्रातील अनेक घोटाळे (कोकण मार्ग, देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीतील आरोप, इतर प्रकरणे)...
हावडा जवळ सिकंदराबाद-शालीमार एक्सप्रेसचे तीन डबे घसरले; प्रवाशांमध्ये चिंता, रेल्वे तातडीने मदतीला धावली.
हावडा, पश्चिम बंगाल- पश्चिम बंगालच्या हावडा येथील नालपूर स्टेशनजवळ आज पहाटे सिकंदराबाद-शालीमार सुपरफास्ट एक्सप्रेस (गाडी क्र. २२८५०)चे तीन डबे घसरले. साऊथ ईस्टर्न रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश चरण यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये बी१ डब्याचा समावेश आहे. ही घटना सकाळी ५:३१ वाजता घडली, जेव्हा ट्रेन मध्य मार्गावरून खालील मार्गावर जात असताना एका पार्सल व्हॅनसह दोन प्रवासी डबे घसरले. प्रवाशांसाठी मदत कार्य...
भारतीय संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला उतुंग भरारी घेण्याचा अधिकार – ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे
पिंपरी – भारतीय संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला उतुंग भरारी घेण्याचा अधिकार प्राप्त झाला असून भारतीय संविधान म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करणारा मानवमुक्तीचा जाहिरनामा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे यांनी केले. भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित पिंपरी येथील प्रबोधनात्मक कार्यक्रमात ‘भारतीय संविधान -मानवमुक्तीचा जाहिरनामा’ या विषयावर व्याख्यान देताना जोंधळे बोलत होते. या कार्यक्रमास राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य अॅड. गोरक्ष लोखंडे, महापालिका ...
कायद्याचा अपमान की VIP संस्कृतीचा कहर? शिरूरमध्ये फॉर्च्युनरवर ‘लोकसभा सदस्य’ स्टिकर; कार्यकर्त्यास दंड नको, फोनवरच माफ!
शिरूर (पुणे): शिरूर शहरात नुकताच घडलेला एक प्रकार सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. सामान्य नागरिकांना नियम मोडल्यास तात्काळ दंड आणि एफआयआरचा सामना करावा लागतो, पण ‘विशेष व्यक्तींच्या’ कार्यकर्त्यांना मात्र केवळ एका फोन कॉलवर माफ केले जाते, ही बाब खरोखरच धक्कादायक आहे. गाडी क्रमांक MH43-BN-4545 ही एक आलिशान फॉर्च्युनर शिरूर परिसरात मिरवत होती. विशेष म्हणजे या गाडीवर 'भारतीय राजमुद्रा', 'सत्यमेव...
पुण्यात भटक्या मांजरांच्या संख्येवर नियंत्रणासाठी महापालिकेची १ कोटींची खर्ची; एका मांजरीच्या नसबंदीवर ₹१९०० खर्च.
पुणे महानगरपालिकेने भटक्या मांजरांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी २०२२ पासून मांजरांची नसबंदी व लसीकरण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेसाठी महापालिकेने मागील तीन वर्षांत तब्बल ९९ लाख ६६ हजार ५०० रुपये खर्च केले आहेत. एका मांजरीच्या नसबंदी प्रक्रियेसाठी ₹१९०० खर्च केला जातो. महानगरपालिकेच्या युनिव्हर्सल अॅनिमल वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून ही मोहीम राबविली जाते. भटक्या मांजरांना पकडून नसबंदी केल्यानंतर त्यांना लसीकरण केले...
“पुण्यात पेट्रोल पंप असोसिएशनचे वरिष्ठ प्रतिनिधी सरकारकडे वाढत्या समस्यांवर तोडगा मागतात; इंधन दर, सुरक्षा आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणींवर भर”
पुणे : स्थानिक पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे वरिष्ठ प्रतिनिधींनी इंधन वितरण प्रणालीमधील वाढत्या समस्यांकडे लक्ष वेधत प्रशासन आणि राज्य शासनाकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे. विविध मुद्द्यांमुळे पेट्रोल पंप चालक, कर्मचारी आणि ग्राहक या तिघांमध्येही नाराजीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अलीकडच्या काळात पेट्रोल पंपांवर — वाढलेले ऑपरेशनल खर्च डिजिटल पेमेंटवरील तांत्रिक अडचणी बँकांच्या सेटलमेंटमध्ये होणारा उशीर पेट्रोल-डिझेल दरांमधील...
प्रशांत किशोरांचे वक्तव्य : “अर्ध्याहून अधिक हिंदू भाजपसोबत नाहीत; गांधी-आंबेडकर-लोहियांच्या अनुयायी हिंदूंनी मुस्लिमांसोबत युती करावी”
नवी दिल्ली : देशातील प्रख्यात निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज वक्तव्य करत सध्याच्या राजकीय समीकरणांना हादरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, “देशातील अर्ध्याहून अधिक हिंदू वैचारिकदृष्ट्या भाजपसोबत नाहीत. गांधी, आंबेडकर आणि लोहिया यांचे विचार मानणाऱ्या हिंदूंनी जर मुस्लिम समाजासोबत हातमिळवणी केली, तर भाजपला पराभूत करणे अशक्य नाही.” प्रशांत किशोर यांनी पुढे स्पष्ट केले की, हिंदू समाज एकसंधपणे...
‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस 2025’ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मॉडेल करिअर सेंटरसाठी ऐतिहासिक कराराचे हस्तांतरण!
पालघरमध्ये नव्या युगाचा प्रारंभ: मॉडेल करिअर सेंटर उभारणीला गती मुंबई, दि. 16: ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस 2025’ या भव्य कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील स्टार्टअप आणि कौशल्य विकासाला नवी दिशा मिळाली आहे. पालघर येथील आयटीआयमध्ये उभारण्यात येणार्या ‘मॉडेल करिअर सेंटर’ संदर्भात भारतीय उद्योग महासंघ (CII) आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) यांच्यात ऐतिहासिक कराराचे हस्तांतरण करण्यात आले. कौशल्य विकासाच्या...
यूपीच्या टोल बूथवर भारतीय सैनिकावर अमानुष हल्ला; व्हायरल व्हिडिओमुळे चार जणांना अटक.
मेरठ: उत्तर प्रदेशच्या मेरठमधील भुनी टोल बूथवर एका भारतीय सैनिकावर टोल कर्मचाऱ्यांनी केलेल्या अमानुष हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राजपूत रेजिमेंटमधील सैनिक कपिल कवड यांना टोल कर्मचाऱ्यांनी खांबाला बांधून मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. घटनेनंतर चार टोल कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. सैनिकाच्या फ्लाइटची चिंता, टोलवर झालेला वाद कपिल कवड सध्या सशस्त्र दलातील रजेवर होते आणि दिल्लीतून श्रीनगरला परतण्यासाठी...
ज्ञानोबा-तुकाराम जयघोषात दुमदुमला टाळगाव-चिखली परिसर महापालिकेच्या शाळेत रंगला भक्ती, एकात्मता आणि परंपरेचा अद्भुत संगम
पिंपरी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५० वी) जयंती वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळेत भक्तिमय वातावरणात भव्य पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने टाळगाव-चिखली परिसरातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळा व महाविद्यालय परिसरातून ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत टाळ-मृदुंगाच्या गजरासह टाळ-चिपळ्यांचा नाद आणि विद्यार्थ्यांच्या अभंगांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. ‘ज्ञानोबा माऊली’ आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत सहभाग घेतला होता. महिला बचत गटांच्या सदस्यांनी, स्थानिक समाजसेवकांनी, वारकरी बांधवांनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली. वारकरी परंपरेतील पालखी सोहळा जसा श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे, तसाच तो एकात्मता आणि सामाजिक बंध दृढ करणारा सोहळा ठरला. पालखी सोहळ्याचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, समाज विकास विभाग उपायुक्त ममता शिंदे, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण कुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपिठाचे संचालक ह. भ. प. राजू महाराज ढोरे ,डॉ. स्वाती मुळे आणि शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यांच्या नियोजनामुळे आणि समन्वयामुळे संपूर्ण मिरवणूक सोहळा शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.
















