नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात कडक कारवाई; 240 वाहनचालकांवर कारवाई
पुणे :- वर्षअखेर आणि नूतन वर्ष २०२६ च्या स्वागतानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो. मात्र, या कालावधीत काही बेजबाबदार वाहनचालक मद्यप्राशन करून वेगात व धोकादायक पद्धतीने वाहने चालवित असल्याने स्वतःच्या तसेच इतर नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात विशेष आणि कडक मोहिम...
हिंजवडीमध्ये मुसळधार पावसामुळे वाहतूक ठप्प – IT कर्मचाऱ्यांची फडणवीस सरकारकडे ‘वर्क फ्रॉम होम’साठी मागणी
पुणे | हिंजवडी आयटी पार्क परिसरात मुसळधार पावसामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून, यामुळे हजारो IT कर्मचाऱ्यांना रोजच्या प्रवासात अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर Forum for IT Employees (FITE) ने महाराष्ट्र सरकारकडे हिंजवडी परिसरातील IT कर्मचाऱ्यांसाठी सक्तीचे ‘वर्क फ्रॉम होम’ (Work From Home) जाहीर करण्याची मागणी केली आहे. वाहतूक कोंडीचे विदारक चित्र FITE ने ट्विटरवर (सध्या X) एक...
पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षेखाली समिती नेमणार – मंत्री डॉ.उदय सामंत
नागपूर : पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षेखाली समिती आहे. मात्र लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार विभागीय आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात येईल, असे मंत्री डॉ.उदय सामंत यांनी सांगितले. पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडीबाबत सदस्य भीमराव तापकीर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर मंत्री डॉ. सामंत बोलत होते. मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, पुणे महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियोजन...
वरळी सीफेसवर संतापजनक प्रकार : पुणे-मुंबई महामार्गावर ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
छत्री लागल्याचा राग, अंगावर संतापाने हल्ला – गर्दुल्ल्याच्या क्रूर कृत्याने वरळी सीफेस हादरले! मुंबईतील वरळी सीफेसवर शनिवारी (१९ एप्रिल) एका महिलेवर झालेल्या हल्ल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ हातातील छत्री चुकून अंगाला लागल्याने ३५ वर्षीय व्यक्तीने काचेचा तुकडा महिलेच्या पाठीत खुपसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दुपारी दीड वाजताच्या सुमारास अनिता बाळू...
स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करण्याची गरज – राज्यपाल
पुणे : निसर्गोपचार, आयुर्वेद, आपली पूर्वीची जीवनशैली, नैसर्गिक शेती तसेच आपल्या जीवनमूल्यांना पुन्हा अवलंबल्यास स्वस्थ भारत बनवू शकू, असा विश्वास राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केला. या कामात निसर्गोपचार वैद्यक व्यवसायी, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतील, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणे अंतर्गत येवलेवाडीतील निसर्गग्राम येथे आयोजित आठव्या निसर्गोपचार दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय आयुष राज्यमंत्री...
वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना – पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती
मुंबई, दि. 20 : महाराष्ट्रात उत्पादित डाळिंबाचा हंगामातील पहिला कंटेनर मुंबईतील जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना करण्यात आला आहे. कृषी पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरून हा कंटेनर रवाना करण्यात आला असून राज्यातील फळनिर्यातीच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, अशी माहिती पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. अमेरिका - भारत कृषी-निर्यातविषयक घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर...
नाशिक–पुणे उच्चगती रेल प्रकल्प: नाशिकचे खासदार वाजे यांनी थेट मार्ग कायम ठेवण्याची मागणी केली
नाशिक – नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी नुकताच केंद्रीय रेल्वा मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आणि नाशिक–पुणे अर्ध-उच्चगती रेल्वे प्रकल्पाच्या नव्या मार्गतोडीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. खासदार वाजे यांनी मागणी केली की, प्रकल्पाची नव्याने घोषित केलेली वळवलेली मार्गतोडी लगेच पुनर्विचारावी आणि नाशिक–पुणे दरम्यान थेट मार्ग कायम ठेवावा, जो सिन्हर–संगमनेर–नरायणगाव–मंचर–चाकण मार्गाने जाणार आहे. दिल्लीतील बैठकीत, खासदार वाजे यांनी लोकांचा भावना...
महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना रचनात्मक कार्यासाठी एकत्र येऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही देशातील सर्वाधिक सक्षम आणि स्थिर असून, सर्व आर्थिक निकषांवर राज्य पात्र ठरत आहे. कर्ज, राजकोषीय तूट, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, सिंचन, वीज, दळणवळण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात राज्याने भरीव काम केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले. राज्याची अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू असताना पुढचा काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत निर्णायक असल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातील सर्व ...
व्होटचोरीविरोधात महाविकास आघाडीचा आज मुंबईत जोरदार मोर्चा; बीएमसीसमोर आंदोलनाची तयारी
मुंबई: महाविकास आघाडीने (MVA) आज मुंबईत व्होटचोरीविरोधात भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांमधील अनियमितता आणि कथित व्होटचोरीच्या आरोपांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या मोर्चात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षांच्या नेत्यांसह हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. मोर्चाची सुरुवात दादर येथून होऊन बीएमसी मुख्यालयावर समाप्त होणार...
“सावित्री कलियुगातली” – २६ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित
पुणे : मराठी चित्रपटसृष्टीचे एक वेगळेच वैशिष्ट्य म्हणजे परंपरा जपत, जुन्या-नव्या विचारांची सांगड घालत मनोरंजनासोबत सामाजिक संदेश देणारे चित्रपट निर्माण करणे. याच परंपरेत भर घालणारा, नात्यांचा अर्थ उलगडणारा आणि स्त्रीशक्तीचे दर्शन घडवणारा “सावित्री कलियुगातली” हा मराठी चित्रपट येत्या २६ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्रात वटसावित्रीचा सण श्रद्धेने साजरा केला जातो. सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळवणाऱ्या सावित्रीची...







