‘Run For Walk’ उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट देशातील नागरिकांमध्ये एकता, आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीची भावना दृढ करणे हे होते. या दौडीत १५० अधिकारी व कर्मचारी, ६१६ विद्यार्थी, ५७० स्वयंसेवक, १५० शाळा, आणि ५० सामाजिक संस्था यांचा एकूण १५३६ जणांचा सहभाग होता — ज्यातून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा उत्सव साजरा झाला.
कार्यक्रमानंतर नागरिकांना राष्ट्राची एकता जपण्याचे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “Run For Walk ही केवळ एक स्पर्धा नसून, ती राष्ट्रभावना, आरोग्य आणि नागरिकांच्या एकतेचा उत्सव आहे.”
या कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी प्रमुख अधिकारी: