महाराष्ट्र
मोबाईल हिसकावून पळणारे तिघे गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात
पुणे – शहरातील लक्ष्मी रोड परिसरात घडलेल्या मोबाईल हिसकावण्याच्या गंभीर घटनेचा अखेर उलगडा झाला असून, विश्रामबाग पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. घटना ३० जुलै २०२५ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी नेहमीप्रमाणे मुळचंद दुकान, लक्ष्मी रोड येथे स्वीट कॉर्न विक्रीचे काम करून घरी जात असताना ते आपल्या आईशी फोनवर बोलत होते. याचवेळी...
मुंबई पोलिसांचा मोठा धडकाः ११२ बांगलादेशी नागरिकांची हकालपट्टी – यंदाचा आकडा ७१९ वर!
मुंबई पोलिसांचा मोठा धडकाः ११२ बांगलादेशी नागरिकांची हकालपट्टी – यंदाचा आकडा ७१९ वर! मुंबई महानगर प्रदेशात बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांविरोधात मोठी कारवाई करताना गुरुवारी पोलिसांनी ११२ जणांना देशाबाहेर पाठवले. यामध्ये मुंबईतून ९२ आणि मीरा-भाईंदर व ठाण्यातून २० जणांचा समावेश आहे. मुंबई पोलिसांचा यंदा हकालपट्टीचा विक्रम – ७१९ जणांना परत पाठवले!अधिकृत आकडेवारीनुसार, जानेवारी १ ते ऑगस्ट ५ दरम्यान मुंबई पोलिसांनी ७१९ बांगलादेशी नागरिकांना...
मॉर्निंग वॉक दरम्यान सोन्याचे मंगळसूत्र हिसकावणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात; दिप बंगला चौकातून अटक
पुणे – शहरातील लॉ कॉलेज रोड परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका महिलेवर झालेल्या जबरी चोरी प्रकरणात पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत आरोपीला गजाआड केले आहे. राजू वामन खुडे (वय ४०, रा. प्रमोद महाले नगर, दिप बंगला चौक, शिवाजीनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-१ ने जलदगतीने तपास सुरू केला...
नाशिक दांपत्याकडून ओळखीच्या लोकांना तब्बल ₹२.२५ कोटींचा गंडा – खोट्या ‘इन्कम टॅक्स’ छाप्याच्या कहाणीने फसवणूक!
नाशिक शहरातील एका दांपत्याने ओळखीच्या लोकांना तब्बल २.२५ कोटी रुपयांचा गंडा घालून शहरात खळबळ उडवली आहे. खोट्या ‘आयकर विभाग’ छाप्याची कथा रचून संशयितांनी पैशांची उकळपट्टी केली. आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी ऋषिराज टेकाडे याला अटक केली असून, त्याची पत्नी रविना टेकाडे फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. तक्रारदार ज्ञानेश्वर संपतराव तिडके (रा. दिंडोरी) यांच्याकडून सुरुवात झाली. संशयिताने तिडके यांना सांगितले...
मूक प्राण्यांचे हिरो: डॉ. राजेश भुरे आणि डॉ. पवन पोखरकर यांच्या निस्वार्थ सेवेची गौरवण्याजोगी कहाणी!
एका ८-वर्षांचा गोल्डन रिट्रीव्हर कुत्र्याच्या जीवनातील संकटकाळात डॉ. राजेश भुरे (MVSc) आणि डॉ. पवन पोखरकर (BVSc and AH) यांनी केलेल्या निस्वार्थ सेवेने पशुप्रेमींच्या हृदयाला स्पर्श केला आहे. अनेक डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सना निदानच सापडत नव्हते, तेव्हा या दोन पशुवैद्यांनी एका दुर्मिळ आजारावर मात केली. असामान्य रोग, अवघड निदान कुत्र्याला दोन्ही डोळे बाहेर येणे (exophthalmos), दृष्टीचे ढळणे आणि वेदनारहित सूज अशी लक्षणे दिसून...
देवभूमीला नवसंजीवनी — ५ पवित्र ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी ८८२ कोटींचा भव्य आराखडा!
मुंबई | महाराष्ट्रातील ५ पवित्र ज्योतिर्लिंगांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. एकूण ₹८८२ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करून धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन आणि स्थानिक विकासाला एकाच वेळी चालना देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे केवळ मंदिर परिसराचा विकासच होणार नाही, तर भाविकांच्या सोयीसुविधा, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही गती मिळणार आहे. विकासाचा व्याप: या आराखड्यात...
“पीसीयू”चा विक्रमी टप्पा — यूजीसी-एचआरडीसीसोबत सामंजस्य कराराने उच्च शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श!
पिंपरी चिंचवड | उच्च दूरदृष्टी, स्पष्ट ध्येय आणि जलद अंमलबजावणी या त्रिसूत्रीवर पुढे जात पिंपरी चिंचवड विद्यापीठाने (पीसीयू) अवघ्या दोन वर्षांत असा विकास साधला आहे, जो इतर अनेक विद्यापीठांना साध्य करण्यासाठी दोन दशके लागली. याच प्रगतीच्या वाटचालीत आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पीसीयू आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्र (एमएमटीसी) तसेच मानवी संसाधन विकास केंद्र...
“चाकण-तळेगाव वाहतूक कोंडीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पहाटेचा थेट पाहणी दौरा – संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ तोडगा काढण्याच्या सूचना”
चाकण | चाकण-तळेगाव परिसरातील सतत वाढणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक, उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी आणि रुग्ण त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज शुक्रवारी पहाटे थेट रस्त्यावर उतरून पाहणी केली. रात्री उशिरा बीड जिल्ह्याचा दौरा पूर्ण करून पहाटेच पुण्यात दाखल झालेले अजित पवार यांनी भोसरीपासून चाकणपर्यंतच्या वाहतूक व्यवस्थेची सखोल तपासणी...
मराठी अस्मितेवर गदा? राज ठाकरेंचा गंभीर इशारा! मराठी माणसांवर अन्यायाचा आरोप
राज ठाकरे नेहमीच मराठी माणसाच्या हितासाठी सजग आणि सावधगिरीचा इशारा देत आले आहेत. सध्याच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये मराठी माणसाला दुय्यम वागणूक मिळतेय, असा आरोप पुन्हा एकदा त्यांनी केला आहे. गेल्या ४ महिन्यांमध्ये अनेक आंदोलनं झाली, पण त्या सगळ्या आंदोलनांमध्ये एक गोष्ट सतत दिसून आली – मराठी माणसाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या एका विशिष्ट पक्षाची सुस्पष्ट उपस्थिती! त्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्यांवर...
“कबुतरखाना निमित्तमात्र… मूळ उद्देश समाजाची ताकद दाखवण्याचा! – मुंबईत मराठी अस्मितेवर घाला?”
मुंबईतील ऐतिहासिक कबुतरखाना परिसर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या घडत असलेल्या घटनांवर नजर टाकल्यास स्पष्ट होते की, कबुतरखाना हा फक्त निमित्त आहे. यामागील मूळ उद्देश काही विशिष्ट समाजांनी आपली संख्या, संघटना आणि ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणे आहे. ही केवळ धार्मिक वा सांस्कृतिक घडामोड नसून, ही एक ठरवून आखलेली रणनीती आहे – जिच्या माध्यमातून मुंबईसारख्या महानगरावर आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न...







