0
0
0
0
0

मुंबई

Home मुंबई Page 30

मुंबईमध्ये आज संध्याकाळनंतर वादळी पावसाची शक्यता; आठवडाभर ढगाळ हवामान कायम राहणार!

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, मुंबईत आज दुपारीपर्यंत उष्ण व दमट हवामान राहणार असून, संध्याकाळनंतर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या संपूर्ण आठवड्यात ढगाळ हवामान व हलक्याफारक्य पावसाच्या सरी मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहेत. आजचं हवामान : सकाळी उष्णता, संध्याकाळी गडगडाटासह पाऊस १२ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मुंबईत ३१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद...

इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर होणार! दुपारी १ वाजता ‘या’ ९ संकेतस्थळांवर उपलब्ध; निकालानंतर गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनाचीही सुविधा

मुंबई / पुणे : अखेर प्रतीक्षेच्या क्षणांना आज विराम मिळणार आहे! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज मंगळवार, १३ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी याबाबत माहिती दिली आहे. नववी विभागीय मंडळांचा समावेश या परीक्षेत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई,...

उल्हासनगर डान्सबारवर कळवा गुन्हे शाखेचा मोठा छापा! २४ बारबालांसह ७ ग्राहक आणि ६ कर्मचाऱ्यांना अटक, शहरात खळबळ

उल्हासनगर (ठाणे) – उल्हासनगर शहरातील एका प्रसिद्ध डान्सबारवर कळवा गुन्हे शाखेने बुधवारी रात्री उशिरा धडक कारवाई केली. या कारवाईत २४ बारबाला, ७ ग्राहक आणि ६ बार कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण उल्हासनगरमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, नागरिकांत चर्चेचा विषय बनला आहे. गुप्त माहितीवरून मोठी धडक कारवाई गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने डान्सबारवर नजर ठेवली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या...

उल्हासनगरमधील लॉजवर कळवा गुन्हे शाखेचा छापा; अनैतिक संबंध प्रकरणी दहा जणांना अटक

उल्हासनगर (ठाणे) – शहरातील शुभम लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डिंग येथे अनैतिक कृत्यांची माहिती मिळाल्यानंतर कळवा गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत चार पुरुष आणि सहा महिलांना अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. लॉज व्यवस्थापक, वेटर व ग्राहकांना अटक अटक करण्यात आलेल्या पुरुषांमध्ये लॉजचा व्यवस्थापक, एक वेटर आणि लॉजमध्ये आलेले ग्राहक यांचा समावेश...

सिद्धिविनायक मंदिरात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नारळ, फुलं, मिठाई यांच्यावर बंदी; भाविकांनी सहकार्याची केली विनंती

मुंबई | प्रतिनिधी – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशभरात धार्मिक स्थळांना संभाव्य धोका असल्याचा गुप्तचर अहवाल प्राप्त झाल्यानंतर, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षा कारणास्तव मंदिरात नारळ, फुले, हार, प्रसाद (मिठाई) व इतर अर्पणांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी रविवार, ११ मे २०२५ पासून लागू करण्यात आली आहे. डुरवा आणि जाईची फुले...

पाकिस्तान झिंदाबाद पोस्ट प्रकरण: बंगालमधील तरुण मुंबईत अटकेत, गावात तणावाचे वातावरण

मुंबई :- पश्चिम बंगालमधील पुर्व बर्धमान जिल्ह्यातील डानिहाट गावचा रहिवासी शरीफ शेख याला मुंबई पोलिसांनी 'पाकिस्तान झिंदाबाद' अशी फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी अटक केली आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानची बाजू घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ही घटना समोर येताच गावात संतप्त वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांना तातडीने हस्तक्षेप करावा लागला. अटक करण्यात आलेला व्यक्ती कोण आहे?शेख हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा असून,...

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेसाठी सिद्धिविनायक मंदिरात विशेष पूजन; देशरक्षणासाठी देवाला कृतज्ञतेची अर्पणवाणी

मुंबई | ८ मे : भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांवर यशस्वी क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर देशभरात अभिमान आणि आनंदाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक आणि ठोस कारवाईनंतर आज सकाळी मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात विशेष पूजन आणि आरती आयोजित करण्यात आली आहे. या पूजनामध्ये भारताचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी प्रार्थना केली जाणार असून, यशस्वी मोहिमेसाठी श्री गणेशाचे...

मुंबई व महाराष्ट्रात आज ७ मे रोजी सायंकाळी ४ वाजता देशव्यापी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

मुंबई  : सैनिकी सज्जतेचा अनुभव, आपत्ती व्यवस्थापन कौशल्यांची तपासणी आणि आपातकालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी नागरिकांची तयारी वाढवण्याच्या उद्देशाने आज दुपारी ४ वाजता देशभरात एकाचवेळी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल राबवण्यात येणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांतील १६ ठिकाणी हे प्रशिक्षणात्मक सराव होणार आहे. १९७१ नंतर प्रथमच एवढ्या व्यापक प्रमाणावर होणारी ही मोहिम आहे, त्यामुळे सर्व नागरिकांनी गंभीरतेने सहभाग घ्यावा, असे...

“गुगल मॅपवर BEST बस मार्गाची माहिती आता तुमच्या बोटांच्या टप्प्यात!” – मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते नव्या युगाची सुरुवात

मुंबई | मंत्रालय :- मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि सुविधाजनक अशी योजना आज प्रत्यक्षात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘गुगल मॅपवर बस मार्ग माहिती प्रणाली’चे भव्य उद्‍घाटन मंत्रालयात पार पडले. यामुळे आता BEST बसेसच्या मार्गांची, थांब्यांची आणि वेळापत्रकाची माहिती नागरिकांना थेट गुगल मॅपवर सहज मिळणार आहे. स्मार्ट सिटी आणि डिजिटलीकरणाकडे एक ठोस पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुंबईसारख्या महानगरात नागरिकांचा...

“नेत्रदान हे श्रेष्ठ दान” – अशोक जोशी यांनी मरणोत्तर नेत्रदान करून समाजासाठी दिला प्रेरणादायी संदेश!

खोपोली | ७ मे २०२५ :- “मरावे परी नेत्र रुपी उरावे” या विचाराला वास्तवात उतरवत खोपोलीतील अशोक जगन्नाथ जोशी (वय ८५) यांनी मरणोत्तर नेत्रदान करून समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. समाजसेवेची जाणिव आणि सामाजिक बांधिलकी जपणारे अशोक जोशी यांचे ६ मे रोजी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. नेत्रदानाची इच्छा – कुटुंबीयांचा उदात्त निर्णय स्वतःच्या मृत्यूनंतर देखील कुणाच्या तरी जीवनात...

Copyright ©