मुंबई

Home मुंबई Page 9

पनवेल तालुका ठाण्यांतील पोलिस करतात काय? लायसन्स च्या नावाखाली बेकायदा धंद्यांविरोधात सक्रिय पणे त्या ठिकाणी कारवाई करणार आहेत का नाही ❓❓❓

0

सदर पनवेल तालुका पोलीस स्टेशन हदीतील नावाजलेल्या कोण गाव येथील नाईट रायडर, नटराज ह्या लेडीस डान्स बार मध्ये अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट, नियम धाब्यावर ठेऊन नाबालिक आणि नोकरनामा नसलेल्या मुलींना बार मध्ये पाचरण करून त्यांना नाचवून त्यांच्या वर बार मालक लाखो रुपयाची उधळण करून घेत असून , सदरच्या ठिकाणी दारू, बीअर , आवाच्या सवा किंमतीत विक्री केली जात असून लोकांची...

२०५० पर्यंत १,२५७ MLD पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी सिडकोकडून नवी मुंबईत भव्य जलसंपदा प्रकल्प!

0

नवी मुंबईतील वाढत्या लोकसंख्येला आणि औद्योगिक-वसाहती विकासाला आवश्यक असलेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सिडको (CIDCO) ने मोठ्या प्रमाणात जलसंपदा पायाभूत प्रकल्प हाती घेतले आहेत. २०५० पर्यंत नवी मुंबईला १,२५७ दशलक्ष लिटर दररोज (MLD) पाण्याची गरज भासणार आहे आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी सिडकोची अनेक महत्त्वाची कामे वेगात सुरू आहेत. 🔹 Hetawane पाणीपुरवठा योजनेचा विस्तार सध्या हेटवणे पाणीपुरवठा योजना चार टप्प्यांमध्ये राबविली जात...

मूक प्राण्यांचे हिरो: डॉ. राजेश भुरे आणि डॉ. पवन पोखरकर यांच्या निस्वार्थ सेवेची गौरवण्याजोगी कहाणी!

0

एका ८-वर्षांचा गोल्डन रिट्रीव्हर कुत्र्याच्या जीवनातील संकटकाळात डॉ. राजेश भुरे (MVSc) आणि डॉ. पवन पोखरकर (BVSc and AH) यांनी केलेल्या निस्वार्थ सेवेने पशुप्रेमींच्या हृदयाला स्पर्श केला आहे. अनेक डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सना निदानच सापडत नव्हते, तेव्हा या दोन पशुवैद्यांनी एका दुर्मिळ आजारावर मात केली. असामान्य रोग, अवघड निदान कुत्र्याला दोन्ही डोळे बाहेर येणे (exophthalmos), दृष्टीचे ढळणे आणि वेदनारहित सूज अशी लक्षणे दिसून...

“भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ वडील आणि मुलाची आत्महत्या: रेल्वे ट्रॅकवर उडी मारून केले जीवन संपविले”

0

भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली, ज्यामध्ये वडील आणि मुलाने धावत्या लोकल ट्रेनच्या ट्रॅकवर उडी मारून आत्महत्या केली. हा दुर्दैवी प्रकार सकाळी अकरा वाजता घडला. मृतांची ओळख हरीश मेहता (६०) आणि जय मेहता (३०) अशी पटली आहे. हरीश मेहता आणि जय मेहता यांनी अचानक असे टोकाचे पाऊल का उचलले याचा शोध वसई रेल्वे पोलिस घेत आहेत....

मुंबईतील मुलुंडमध्ये ऑडीने दोन रिक्षांना धडक दिली, १ जण गंभीर; तीन महिन्यात तिसरे हिट-एंड-रन प्रकरण

0

मुंबईच्या मुलुंड भागात, २२ जुलै सोमवार रोजी एका वेगाने धावणाऱ्या ऑडीने दोन रिक्षांना धडक दिली. या अपघातात तीन जण जखमी झाले, ज्यामध्ये एक रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे आणि आरोपी चालक फरार आहे. मागील तीन महिन्यांतील महाराष्ट्रातील लक्झरी कारच्या सहभागाने घडलेले हे तिसरे हिट-अँड-रन प्रकरण आहे. मुलुंड अपघातातील जखमींमध्ये दोन प्रवासी देखील समाविष्ट आहेत. कार अपघातानंतर, मुलुंड पोलिसांनी ऑडी जप्त...

पोलिस आयुक्तांचे नाव घेऊन खंडणी मागणाऱ्यांचा भंडाफोड – पत्रकार जितीन शेट्टीसह अन्य आरोपी रंगेहाथ अटक

0

पुणे : शहरातील व्यावसायिकांकडून खंडणी उकळण्याचे धाडस काही पत्रकारांनीच केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पोलिस आयुक्तांचे नाव वापरून दबाव टाकत लाखो रुपयांची मागणी करणाऱ्या जितीन शेट्टीसह अन्य पत्रकारांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर व्यावसायिक समाजात दिलासा तर माध्यम क्षेत्रात धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पत्रकारांनी व्यावसायिकांना “पोलीस आयुक्त तुमच्यावर कारवाई करणार आहेत, पण आमच्याशी सेटलमेंट केल्यास प्रश्न सुटेल”...

मुंबईसाठी दिलासा! मुसळधार पावसामुळे तलावांच्या जलसाठ्यात वाढ; साठा २५.१७ टक्क्यांवर

0

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा वाढून २५.१७ टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने दिली आहे. शहराच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात कमी झाली असली, तरी अजूनही समाधानकारक साठा होण्यासाठी पुढील काही दिवस पावसाची गरज भासत आहे. सध्या तलावांमध्ये किती पाणीसाठा आहे?BMC च्या २० जून रोजीच्या अहवालानुसार, ३,६४,२३३ मिलियन...

मुंबईच्या रस्त्यांवर लवकरच धावणार बाईक टॅक्सी! प्रवाशांसाठी मोठा दिलासा

0

मुंबईतील सततच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून राज्य सरकारने बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना जलद, स्वस्त आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय मिळणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानभवनात माध्यमांशी बोलताना यासंदर्भात घोषणा केली. लवकरच बाईक टॅक्सी सेवेला मंजुरी मिळेल आणि मुंबईच्या रस्त्यांवर नव्या वाहतूक सुविधेचा शुभारंभ होईल, अशी माहिती त्यांनी दिली. 🔹 मुंबईच्या वाहतूक कोंडीतून...

लवळे, पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिम्बॉयसिस आर्टिफिशियल इंटेलिजेंस इन्स्टिट्यूट (SAII) चे भव्य उद्घाटन

0

पुणेच्या लवळे कॅम्पसमध्ये आज राज्याच्या भविष्यास आकार देणारा ऐतिहासिक सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सिम्बॉयसिस आर्टिफिशियल इंटेलिजेंस इन्स्टिट्यूट (SAII)’ चे भव्य उद्घाटन करण्यात आले. या विशेष प्रसंगी सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक व कुलपती पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्यासह अनेक मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस हे...

“राहुल गांधींच्या आजोबांचे आजोबासुद्धा संविधान बदलू शकत नाहीत”: रामदास आठवले यांचे नवी मुंबईत भाषण.

0

नवी मुंबई - केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नवी मुंबईतील कामोठे येथे झालेल्या भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारसभेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना जोरदार टोला लगावत त्यांचे संविधान बदलण्याचे आरोप फेटाळून लावले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाला कोणीही बदलू शकत नाही, असे आठवले यांनी ठामपणे सांगितले. “राहुल गांधींच्या आजोबांचे आजोबासुद्धा संविधान बदलू शकत नाहीत,” असे ते...

Copyright ©