मुंबई

Home मुंबई Page 39

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात “वनराणी” मिनी ट्रेन सेवेचा शुभारंभ; पर्यटकांसाठी नवा आकर्षणबिंदू

0

मुंबईतील Sanjay Gandhi National Park येथे “वनराणी (मिनी ट्रेन)” सेवेचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडला. या नव्या सेवेमुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांना आणि पर्यटकांना निसर्गरम्य वातावरणाचा आनंद अधिक जवळून अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री Piyush Goyal, माजी खासदार Gopal Shetty, महाराष्ट्राचे वनमंत्री Ganesh Naik, आमदार Pravin Darekar, आमदार Manisha Chaudhary तसेच आमदार Sanjay Upadhyay यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते....

इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर होणार! दुपारी १ वाजता ‘या’ ९ संकेतस्थळांवर उपलब्ध; निकालानंतर गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनाचीही सुविधा

0

मुंबई / पुणे : अखेर प्रतीक्षेच्या क्षणांना आज विराम मिळणार आहे! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज मंगळवार, १३ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी याबाबत माहिती दिली आहे. नववी विभागीय मंडळांचा समावेश या परीक्षेत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई,...

कर्तव्यावर असताना वीरमरण; मुंबई पोलीस अंमलदार विदीप जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली

0

मुंबई | प्रतिनिधी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार विदीप जाधव यांचे कर्तव्य बजावत असताना झालेल्या अपघाती निधनाने संपूर्ण पोलीस दलासह महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सेवा बजावत असताना त्यांचे अकाली जाणे ही अत्यंत दुःखद व हृदयद्रावक घटना आहे. विदीप जाधव हे एक कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि मेहनती पोलीस अंमलदार म्हणून ओळखले जात होते. नेहमीच जबाबदारीने काम करत, कायदा-सुव्यवस्थेचे...

आर्थिक क्षेत्रातील ‘हक्क न सांगितलेल्या मालमत्ता निपटारा’ मोहीम नागरिकांसाठी उपयुक्त -जिल्हाधिकारी सौरभ कटियार

0

आर्थिक क्षेत्रातील 'हक्क न सांगितलेल्या मालमत्ता निपटारा' मोहीम केवळ वित्तीय क्षेत्रासाठीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही अत्यंत उपयुक्त आहे. नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी  सौरभ कटियार यांनी येथे केले. वित्तीय सेवा विभाग, अर्थ मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या सल्ल्यानुसार राज्यस्तरीय बँकर्स समिती (एसएलबीसी) महाराष्ट्र व जिल्हा अग्रणी बँकेतर्फे राज्यात "हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा" या उपक्रमांतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई उपनगरमधील या शिबिराचा शुभारंभ...

कांदिवलीत गुंडांची मुजोरी; पोलिसांवर हल्ला, व्हिडिओ व्हायरल – रोहित पवारांचा सरकारवर थेट सवाल

0

मुंबई | प्रतिनिधी :- मुंबईच्या कांदिवली पश्चिम भागातील एकतानगर परिसरात स्थानिक गुंडांच्या दोन गटांमध्ये झालेल्या राड्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या वादाची माहिती मिळताच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरच गुंडांनी हात उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत पोलिसांची कॉलर पकडणे, शिवीगाळ करणे आणि मारहाण केल्याचे व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येत असून, हा व्हिडिओ सध्या सोशल...

मीरा रोड येथे कार भाड्याने देण्याच्या आमिषाने तब्बल १३७५ लोकांची २० कोटी रुपयांची फसवणूक!

0

मीरा रोड | ठाणे जिल्हा :- मीरा रोड परिसरात एक भव्य कार रेंटल घोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणात तब्बल १३७५ नागरिकांची सुमारे २० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. फसवणुकीच्या या धक्कादायक प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. कार भाडे देतो म्हणत लोकांना गंडवले; लाखो रुपयांची गुंतवणूक वाया फसवणूक करणाऱ्या आरोपींनी "कार भाड्याने द्या आणि कमवा" अशा आमिषाने नागरिकांना...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘भारतीय संस्कृतीचे पुरोधा राजा ऋषभ’ या ग्रंथाचे भव्य प्रकाशन

0

मुंबई – भारतीय संस्कृतीच्या समृद्ध परंपरेचा वेध घेणाऱ्या ‘भारतीय संस्कृतीचे पुरोधा राजा ऋषभ’ या महत्वपूर्ण ग्रंथाचे प्रकाशन आज मुंबई येथे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यिक, इतिहास अभ्यासक, धर्मगुरू तसेच मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते. या पुस्तकात भारतीय संस्कृतीचे आद्य प्रवर्तक मानले जाणारे राजा ऋषभदेव यांचे जीवन, तत्त्वज्ञान, समाजरचना आणि संस्कृती...

व्होटचोरीविरोधात महाविकास आघाडीचा आज मुंबईत जोरदार मोर्चा; बीएमसीसमोर आंदोलनाची तयारी

0

मुंबई: महाविकास आघाडीने (MVA) आज मुंबईत व्होटचोरीविरोधात भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांमधील अनियमितता आणि कथित व्होटचोरीच्या आरोपांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या मोर्चात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षांच्या नेत्यांसह हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. मोर्चाची सुरुवात दादर येथून होऊन बीएमसी मुख्यालयावर समाप्त होणार...

कल्याण-डोंबिवलीच्या २७ गावांचा पाण्याचा प्रश्न होणार कायमस्वरूपी सुटणार: ३५७ कोटींचा प्रकल्प मंजूर

0

कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांतील नागरिकांना अनेक वर्षांपासून पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. मात्र, आता त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने ३५७ कोटी रुपयांचा जलपुरवठा प्रकल्प मंजूर केला आहे, जो या गावांमध्ये कायमस्वरूपी पाणीपुरवठा सुनिश्चित करेल. प्रकल्पाचा मुख्य उद्देश: या प्रकल्पामार्फत गावांमध्ये सतत व शुद्ध पाणीपुरवठा करणे आणि पाण्याच्या उपलब्धतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे...

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासात पारदर्शकतेची मागणी – लॉटरी प्रक्रिया ठरलेल्या क्रमानेच व्हावी, रहिवाशांचा ठाम आग्रह

0

मुंबई: वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या लॉटरी प्रक्रियेबाबत चाळीतील रहिवाशांनी ठाम भूमिका घेतली असून, ही प्रक्रिया चाळींच्या ठरलेल्या आणि अधिकृत क्रमानेच पार पडावी, अशी जोरदार मागणी ते सातत्याने करत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही संदिग्धता राहू नये, तसेच पूर्ण नियमितता आणि पारदर्शकता राखली जावी, हीच रहिवाशांची प्रमुख मागणी आहे. बी डीडी चाळ पुनर्विकास हा मुंबईतील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी...

Copyright ©