मुलाखत
“आता थांबायची वेळ संपली आहे, बदल घडवण्याची वेळ आली आहे!” – अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी यांचे भावनिक आवाहन
प्रभाग क्रमांक २५ (क) मधील प्रचार सभेत अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत भावनिक आणि प्रेरणादायी भाषण केले. “आज मी तुमच्यासमोर केवळ उमेदवार म्हणून नाही, तर तुमची मुलगी, तुमची बहीण आणि तुमचा विश्वासू प्रतिनिधी म्हणून उभी आहे,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. स्वतःची ओळख करून देताना त्या म्हणाल्या, “मी आहे – अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी. एक...
मतदान जनजागृतीच्या ब्रँड ॲम्बेसिडर श्रेया बुगडे यांच्या उपस्थितीत दुर्गादेवी टेकडीच्या पायथ्याशी लोकशाहीचा जागर
पिंपरी, दि. १० जानेवारी २०२६ :- अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या माध्यमातून करण्यात येणारी मतदान जनजागृती… ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ अशा जोशपूर्ण घोषणांनी दुमदुमलेला परिसर… आणि लोकशाहीच्या जागृतीसाठी निघालेली शेकडो जणांची प्रभातफेरी…असे उत्साहपूर्ण वातावरण आज सकाळी निगडी येथील दुर्गादेवी टेकडीच्या पायथ्याशी निर्माण झाले होते. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आणि प्रत्येक मतदाराला मतदानाच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी...
मलकापूर: भरधाव कारच्या धडकेत वृद्ध जागीच ठार; पोलिसांकडून चौकशी सुरू
मलकापूरमध्ये राष्ट्रीय महामार्ग ५३ वर चालणाऱ्या व्यक्तीला भरधाव कारने उडवल्याचा ४४ सेकंदाचा धक्कादायक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये भरधाव कार व्यक्तीला जोरदार धडक देऊन हवेत उडवत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील मलकापूर येथे सोमवारी कुड्रा बुद्रुक महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत एक वृद्ध व्यक्ती जागीच ठार झाला. सामाजिक माध्यमांवर व्हायरल झालेल्या या घटनेच्या कथित व्हिडिओमध्ये, गडद लाल रंगाची कार थोडीशी वळून...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘भारतीय संस्कृतीचे पुरोधा राजा ऋषभ’ या ग्रंथाचे भव्य प्रकाशन
मुंबई – भारतीय संस्कृतीच्या समृद्ध परंपरेचा वेध घेणाऱ्या ‘भारतीय संस्कृतीचे पुरोधा राजा ऋषभ’ या महत्वपूर्ण ग्रंथाचे प्रकाशन आज मुंबई येथे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यिक, इतिहास अभ्यासक, धर्मगुरू तसेच मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते. या पुस्तकात भारतीय संस्कृतीचे आद्य प्रवर्तक मानले जाणारे राजा ऋषभदेव यांचे जीवन, तत्त्वज्ञान, समाजरचना आणि संस्कृती...
दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग; भाजपच्या गटात हालचाली, पुढचे ४ दिवस ठरणार निर्णायक
नवी दिल्ली | प्रतिनिधी :- संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील चार दिवस देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १९ डिसेंबरला मोठा राजकीय भूकंप होईल, असे भाकीत केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी...
वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना – पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती
मुंबई, दि. 20 : महाराष्ट्रात उत्पादित डाळिंबाचा हंगामातील पहिला कंटेनर मुंबईतील जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना करण्यात आला आहे. कृषी पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरून हा कंटेनर रवाना करण्यात आला असून राज्यातील फळनिर्यातीच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, अशी माहिती पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. अमेरिका - भारत कृषी-निर्यातविषयक घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर...
तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील बलिदान स्थळ तुळापूर (ता. हवेली) व समाधी स्थळ मौजे वढू बुद्रुक (ता. शिरूर) दरम्यान नवीन रस्त्याची निर्मिती व भीमा नदीवरील पुल विकास कामांचा अंतर्भाव असलेल्या 532.51 कोटी किमतीच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी...
उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपचा प्रचार शिगेला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य जाहीर सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित केले. या सभेमुळे उल्हासनगरमध्ये भाजपच्या प्रचाराला नवे बळ मिळाले असून, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे...
गोंदिया जिल्ह्यातील अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
गोंदिया जिल्ह्यातील सीएमआर तांदूळ जमा करून ठेवल्याप्रकरणी चौकशी करण्यात येईल. तसेच या प्रकरणातील जिल्हा पुरवठा अधिकारी याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. गोंदिया जिल्ह्यातील सीएमआर तांदुळाच्या साठ्याप्रकरणी सदस्य नाना पटोले यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम यांनी माहिती देताना सांगितले की, सन २०२३–२४ या वर्षासाठी आवश्यक...
दिल्लीतील महत्त्वपूर्ण भेट – राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांच्याशी महिलांच्या सक्षमीकरणावर सखोल चर्चा
दिल्ली येथे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. विजयाताई रहाटकर यांची सदिच्छा भेट घेण्याचा योग आला. या भेटीदरम्यान महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण, मार्गदर्शक आणि सखोल चर्चा झाली. महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची परिणामकारक अंमलबजावणी कशी अधिक सक्षमपणे करता येईल, यावर या चर्चेत विशेष भर देण्यात आला. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली...










