आपल्या भाषणात, राहुल गांधी म्हणाले, “आपल्या सर्व महान पुरुषांनी अहिंसा आणि भीती दूर करण्याबद्दल बोलले आहे… परंतु जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते फक्त हिंसा, द्वेष, असत्याबद्दलच बोलतात…”
पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींच्या टिप्पण्यांवर तीव्र आक्षेप घेतला, “संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे हा अतिशय गंभीर विषय आहे.” विरोधक आणि सत्ताधारी एनडीएच्या खासदारांमध्ये तीव्र वादविवादानंतर, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींची माफी मागण्याची मागणी केली.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा समाचार घेतला आणि माफी मागण्याचा आग्रह धरला. “विरोधी पक्षनेत्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की जे स्वत:ला हिंदू म्हणून ओळखतात ते हिंसा बोलतात आणि करतात. त्यांना माहित नाही की लाखो लोक अभिमानाने स्वत:ला हिंदू म्हणवतात. कोणत्याही धर्माशी हिंसा जोडणे चुकीचे आहे. त्यांनी माफी मागावी,” असे त्यांनी सांगितले.