Home Breaking News पुण्यात भर पावसात रस्त्यांचे डांबरीकरण; नागरिकांत संताप

पुण्यात भर पावसात रस्त्यांचे डांबरीकरण; नागरिकांत संताप

49
0
पुणे : शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच, महापालिकेने रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम सुरू ठेवल्याने चर्चा रंगली आहे. पावसाच्या पाण्यात डांबर टाकण्याची पद्धत कितपत योग्य आहे? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मागील काही वर्षांचा अनुभव पाहता, पावसाळ्यात डांबर टाकलेल्या रस्त्यांवर काही दिवसातच खड्डे पडतात आणि मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीसाठी पैसे खर्च होतात. त्यामुळे अशा प्रकारचे काम केवळ तात्पुरता दिखावा असून करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याची टीका नागरिक करत आहेत.

वाहतूक कोंडी, पाणी साचणे आणि खड्ड्यांमुळे आधीच पुणेकर त्रस्त आहेत. अशा वेळी पावसातच डांबर टाकणे हे प्रशासनाचे गैरजबाबदार पाऊल असल्याचे सांगत सोशल मीडियावरही संताप व्यक्त होत आहे. महापालिकेकडून दर्जेदार रस्ते द्यावेत आणि नियोजनबद्ध काम व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरवर्षी पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यांमुळे अपघात, जीवितहानी आणि वाहतूक कोंडी वाढते. त्यामुळे या वर्षी तरी महापालिकेने योग्य पद्धतीने आणि योग्य हंगामातच रस्त्यांचे डांबरीकरण करावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
“पुण्यात भर पावसात महापालिकेचे डांबरीकरण; काही दिवसात खड्डे पडणार का?”