पुणे/विदर्भ, २२ एप्रिल २०२५: पुणे आणि विदर्भातील नागरिकांना यंदाच्या एप्रिल महिन्यात उष्णतेच्या लाटेचा तीव्र फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दररोज तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर जात असल्याने उन्हाचा चटका अधिक जाणवू लागला आहे. नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावतीसह पुणे शहरात सुद्धा तापमानाने उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस “हीटवेव्ह अलर्ट” जारी केला असून, नागरिकांना उन्हात गरजेशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः दुपारी १२ ते ४ या वेळेत घरात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार, उन्हामुळे डिहायड्रेशन, लू, उष्माघात यासारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे भरपूर पाणी पिणे, थंड पेय घेणे, पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचे सैलसर कपडे घालणे, डोक्यावर टोपी किंवा छत्री वापरणे, उन्हात थेट उभं राहणं टाळणं या गोष्टी आवश्यक असल्याचं सांगण्यात येत आहे.
तापमानामुळे शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि हृदयविकार व मधुमेहग्रस्त रुग्णांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये हीट स्ट्रोकसाठी विशेष वॉर्ड तयार ठेवण्यात आले आहेत.
हवामान विभागाचे म्हणणे:
“हवामानातील बदलांमुळे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तापमानाचा वेगाने वाढ होतोय. ही स्थिती पुढील काही दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.”
उष्णतेपासून बचावासाठी टिप्स:
-
दुपारी उन्हात जाणं टाळा
-
भरपूर पाणी आणि फळांचे रस प्या
-
टोपी, छत्री, सनग्लासचा वापर करा
-
अंगावर थेट ऊन लागू देऊ नका
-
अन्न ताजं आणि हलकं असू द्या





