महाराष्ट्र
स्वारगेट बलात्कार प्रकरण: उद्धव ठाकरे यांचा संताप, महिलांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या निर्घृण बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, विरोधी पक्षांसह विविध सामाजिक संघटनांनी देखील सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. पुण्यातील शिवसेना नेते वसंत मोरे यांच्याशी फोनवर चर्चा करत त्यांनी सरकारवर टीकास्त्र...
पुण्यात दहशतवाद्याला अटक! ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाच्या नेटवर्कचा पर्दाफाश
पुणे | महाराष्ट्र एटीएसने पुण्यातील कोंढवा भागात मोठी आणि संवेदनशील कारवाई करत अल-कायदाशी संबंध असलेल्या संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. झुबेर हंगरकर असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याच्यावर UAPA (Unlawful Activities Prevention Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पुण्यातील सुरक्षा यंत्रणा व नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. एटीएस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून कोंढवा परिसरावर...
मुंबईतील टीव्ही अभिनेत्री सायबर फसवणुकीची बळी — ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली ६.५ लाखांची लूट!
मुंबई : मुंबईतील 26 वर्षीय टेलिव्हिजन अभिनेत्रीला ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली तब्बल ₹6.5 लाखांचा फसवणूक करणाऱ्यांनी गंडा घातला. स्वतःला दिल्ली पोलिसांच्या सायबर विभागातील अधिकारी म्हणून ओळखणाऱ्या व्यक्तीने व्हिडिओ कॉलद्वारे अभिनेत्रीला जवळपास सात तास ‘अटकेत’ ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना या आठवड्याच्या सुरुवातीला घडली असून, पीडितेने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. अभिनेत्री मूळची बंगाली टेलिव्हिजन मालिकांमधून प्रसिद्ध असून,...
लातूर भाजपला मोठे बळ! विविध क्षेत्रातील मान्यवरांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; विकासाच्या राजकारणावर विश्वास व्यक्त
लातूर | प्रतिनिधी — पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या परिवर्तनकारी विकासकार्याने आणि मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या चौफेर विकासाच्या धोरणांनी प्रभावित होऊन लातूर जिल्ह्यात भाजपला मोठे बळ मिळाले आहे. काल झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात नगरसेवक श्री. रविशंकर जाधव व श्री. पुनित पाटील, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. चंद्रकांत सोळुंके, पत्रकार...
सलमान खानला ‘माफी मागा नाहीतर ५ कोटी भरा’ धमकी; लॉरेन्स बिश्नोई टोळीचा खळबळजनक इशारा.
सलमान खानला मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण युनिटकडे नवीन धमकी; वाचायचं असेल तर मंदिरात जाऊन माफी मागावी किंवा ५ कोटी दंड भरावा लागेल. मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सोमवारच्या दिवशी एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण युनिटला संदेश पाठवून सांगितले की, सलमान खानने मंदिरात जाऊन काळवीट हत्या प्रकरणात माफी मागावी किंवा...
“दहा वर्षांत पुण्याची ‘स्वच्छ हवा’ हरवतेय! IITM शास्त्रज्ञांचा इशारा – Moderate दिवसही आता सुरक्षित नाहीत”
पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या हवेच्या गुणवत्तेत सातत्याने घसरण होत असून 19 ते 21 नोव्हेंबर या तीन दिवसांत शहरातील PM10 प्रदूषण सर्वाधिक नोंदवले गेले आहे. सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्ड (CPCB) च्या नोंदींनुसार नोव्हेंबरमधील जवळपास अर्धा महिना ‘मॉडरेट’ (Moderate) श्रेणीमध्ये गेला आहे, ज्यात PM10 चे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढलेले दिसते. IITM (Indian Institute of Tropical Meteorology) च्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यांनुसार ही स्थिती...
गुंतवणुकीचे आमिष दाखवत 2.58 कोटींची फसवणूक — अकोला सायबर पोलिसांनी ‘नागपूर मॉडेल’ उद्ध्वस्त करत दोन मास्टरमाइंडना जेरबंद केले”
अकोला सायबर पोलिसांनी एक भव्य आणि अत्यंत काटेकोर अशी कारवाई करत शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने तब्बल 2 कोटी 58 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. नागपुरातून दोन सराईत आरोपींना गाठून सायबर पोलिसांनी महाराष्ट्रातील चर्चित ‘नागपूर मॉडेल’ स्कॅमची कणा मोडून काढली. ही फसवणूक इतकी व्यवस्थित आखलेली होती की सामान्य गुंतवणूकदार सहज त्यात अडकावा असे तिचे...
रणांगणातील खऱ्या योद्ध्यांचा अढळ निर्धार – उन्हा-पावसाची पर्वा न करता लढणारे मराठे!
एकदा रणात उतरल्यावर मराठा योद्धे कोणत्याही अडचणींची पर्वा करत नाहीत. मग तो कडाक्याचा उन्हाळा असो वा संततधार पाऊस, त्यांच्या ध्येयासाठी लढण्याची जिद्द आणि शक्ती कधीही कमी होत नाही. मराठ्यांच्या रक्तातच धैर्य, पराक्रम आणि चिकाटी ओतप्रोत भरलेली आहे. इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी गड-किल्ले वाचवण्यासाठी कितीही संकटे सोसली, तरी मागे हटले नाहीत. आजही मराठा समाजातील युवक, शेतकरी, सैनिक, क्रीडापटू, तसेच समाजकारणात...
‘Run For Walk’ एकता दौडीत हजारो नागरिकांचा सहभाग — राष्ट्रभावना आणि आरोग्याचा संगम!
पुणे: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘Run For Walk’ या एकता दौडीत नागरिक, विद्यार्थी, पोलीस अधिकारी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या उपक्रमाचे आयोजन पुणे शहर पोलीस, अंमली पदार्थ विरोधी पथक, तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६:३० वाजता पुणे पोलीस आयुक्तालयातून झाली. या प्रसंगी पुणे...
मराठी कलाक्षेत्रात शोककळा, परचुरेंना भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई: मराठी रंगभूमी, सिनेमा आणि दूरदर्शनच्या विश्वात आपला विशेष ठसा उमटवणारे अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांचं आज निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण मराठी कलाक्षेत्र शोकसागरात बुडालं आहे. परचुरे यांनी आपल्या अभिनयाने आणि विनोदी कौशल्याने मराठी प्रेक्षकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या हास्यप्रधान भूमिकांनी लाखो चेहऱ्यांवर हसू आणलं, तर गंभीर भूमिकांनी प्रेक्षकांना अंतर्मुख केलं. कर्करोगाशी दीर्घ संघर्ष, परतल्यावर पुन्हा...














