Breaking News

Home Breaking News Page 256

“राणेंना ओवैसी खिशात टाकेल?” – AIMIM नेता इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने राजकीय तापमान चढले!

0

राज्यातील निवडणूक वातावरण तापत असताना AIMIM चे खासदार इम्तियाज जलील यांच्या एका वक्तव्याने नवीन राजकीय खळबळ उडवली आहे. “ओवैसी सहजपणे राणेंना आपल्या खिशात टाकून देईल,” असे त्यांनी केलेले विधान सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. इम्तियाज जलील यांच्या या विधानाचा व्हिडिओ व्हायरल होताच विरोधी पक्षांनी AIMIM आणि जलील यांच्यावर जोरदार टीका सुरू केली. अनेकांनी...

मोठा घोटाळा टळला! महाराष्ट्र PWD विभागाच्या खात्यातून 111 कोटींचा फ्रॉड करण्याचा प्रयत्न उधळला

0

महाराष्ट्रात पुन्हा एकदा सरकारी खात्यावर मोठ्या आर्थिक घोटाळ्याची सावली दाटलेली असताना, सतर्क अधिकाऱ्यांनी वेळेवर कारवाई करून तब्बल 111 कोटी रुपयांचा मेगा फ्रॉड थांबवण्यात यश मिळवले आहे. ही कारवाई केवळ आर्थिक नुकसान टाळणारी नाही तर राज्यातील सायबर सुरक्षेच्या धोक्यांवर मोठा प्रकाश टाकणारी ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही अज्ञात सायबर गुन्हेगारांनी महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकृत खात्यात हॅक करून मोठी रक्कम...

पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची भेट – सिम्बायोसिस विद्यापीठातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे निरीक्षण

0

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे येथे स्थापन करण्यात आलेल्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ या अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना आणि युवकांना आधुनिक तंत्रज्ञान, इंडस्ट्री 4.0 आणि डिजिटल स्किल्सच्या क्षेत्रात उत्कृष्ट प्रशिक्षण दिले जाणार आहे. या दौऱ्यात दोन्ही मान्यवरांनी केंद्रातील प्रयोगशाळा,...

“मुख्यमंत्री फडणवीसांकडून आमदार गोरखेंच्या कार्याचे कौतुक; अ, ब, क,ड आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय अंतिम टप्प्यात”

0

पुणे: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त साहित्य प्रकाशन समारंभ प्रसंगी अण्णाभाऊंच्या कार्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले. यावेळी बोलताना, देवेंद्र फडणवीस यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी पैलू जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमादरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अमित गोरखे यांनी सुरू केलेल्या #माहिती_नसलेले_अण्णाभाऊ या उपक्रमाचे विशेष कौतुक...

प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदारी अत्यावश्यक -राज्य मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे

0

मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवेतील २०२४ च्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी राज्य मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांची मुख्य माहिती आयुक्त कार्यालयात भेट घेऊन संवाद साधला. या भेटीदरम्यान श्री. राहुल पांडे यांनी माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शासन व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढीस लागल्याचे सांगितले. राज्य मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे म्हणाले, महाराष्ट्र राज्यात इतर राज्यांप्रमाणे एकच आयोग नसून प्रत्येक महसूल विभागासाठी स्वतंत्र माहिती आयोग कार्यरत आहे. यामुळे नागरिकांना विभागीय...

नागरिकांना केंद्रबिंदू मानून शहर सुधारण्याची संरचना तयार करणार – सभापती संजय नाना काटे

0

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन त्यांच्या जीवनमानात अधिक सुधारणा करण्यासाठी नागरिकांना केंद्रबिंदू मानून शहर सुधारण्याची सर्वसमावेशक संरचना तयार करण्यात येणार आहे. शहराचा विकास करताना नागरिकांच्या आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत नियोजनबद्ध पद्धतीने कामे राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शहर सुधारणा समितीचे सभापती संजय नाना काटे यांनी दिली. शहर सुधारणा समितीची बैठक महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील...

‘आदर्श आणि समृद्ध गाव’ संकल्पपुर्तीतून राज्य व राष्ट्राच्या विकासाला नवा वेग

0

पुणे : महाराष्ट्रात ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी सरकारकडून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘आदर्श आणि समृद्ध गाव’ हा संकल्प, ज्याच्या पूर्तीतून केवळ राज्याचाच नाही तर संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग सुकर होईल, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. गाव हे देशाचे मूलभूत घटक असून, प्रत्येक गाव विकसित झाल्यासच देशाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. शाश्वत शेती,...

“न्यायप्रणालीत ऐतिहासिक सुधार — नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रदर्शनाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भव्य उद्घाटन”

0

आझाद मैदान, मुंबई :- मुंबईच्या आझाद मैदानात आज न्यायव्यवस्थेतील सर्वात मोठ्या सुधारणांपैकी एक ठरणाऱ्या नवीन फौजदारी कायद्यांवरील व्यापक जनजागृती प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. न्यायप्रक्रियेतील गती, पारदर्शकता आणि नागरिककेंद्रित बदलांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी उभारण्यात आलेले हे प्रदर्शन अत्यंत प्रभावी ठरले. कार्यक्रमासाठी राज्यातील अनेक मान्यवर विशेषतः उपस्थित होते. यात 🔸 विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर🔸 उपमुख्यमंत्री अजित पवार🔸...

“बनावट दागिन्यांच्या साहाय्याने लाखोंची फसवणूक — विमानतळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराफ व्यावसायिकांना लुबाडणारा भामटा अखेर जेरबंद”

0

पुणे : नामांकित सराफ दुकानदारांना लक्ष्य करून बनावट दागिन्यांच्या सहाय्याने फसवणूक करणाऱ्या हुषार भामट्याला पुणे विमानतळ पोलिसांनी अखेर पकडले आहे. दीर्घकाळापासून ज्वेलरी शॉप्सना चकवणारा हा आरोपी विविध शाखांमध्ये हातचलाखीने खऱ्या सोन्याच्या अंगठ्या लंपास करून गायब होत असे. अखेर पोलिसांच्या सततच्या तपासामुळे हा गुन्हेगारी प्रकार उघडकीस आला.  घटना कशी घडली? २३ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी पी.एन.जी. ज्वेलर्स, विमाननगर शाखेत एक ग्राहक अंगठ्या...

पुणे: लोणी काळभोर पोलिसांची मोठी कारवाई – बदललेल्या सायलेन्सरसह २२ बुलेट जप्त, वाहनमालकांना प्रत्येकी ₹२५,००० दंड!

0

अवैधरित्या मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या बुलेटस्वारांवर पोलिसांचा दणका! पुणे – शहरातील अवैधरित्या बदललेल्या सायलेन्सरने ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बुलेटस्वारांवर लोणी काळभोर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. तब्बल २२ बुलेट मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून प्रत्येक वाहनमालकाला ₹२५,००० दंड ठोठावण्यात आला आहे. सायलेन्सर मॉडिफिकेशनमुळे ध्वनी प्रदूषण – नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई! बुलेटस्वार आपल्या गाड्यांचा सायलेन्सर बदलून जबरदस्त आवाज काढत इतर नागरिकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी...

Copyright ©